आध्यात्मिक उत्क्रांती ही एकाच वेळी विभिन्न मार्गांनी वाटचाल करणारी एक विशाल आणि जटिल प्रक्रिया असते. पूर्णयोगाच्या साधकाकडे जे गुण अत्यावश्यक असतात त्यापैकी एक गुण म्हणजे प्रामाणिकपणा (sincerity).
आपण व्यवहारात वावरत असताना ज्याला प्रामाणिकपणा म्हणतो तो प्रामाणिकपणा आणि श्रीअरविंद व श्रीमाताजी ज्याचे प्रतिपादन करतात, तो प्रामाणिकपणा; या दोन्हीमध्ये काही साम्य-भेद आहेत का, हे लक्षात घेणे महत्त्वाचे ठरते.
साधनेच्या संदर्भात तर या प्रामाणिकपणाचे मोल अधिकच उजळलेले दिसते. कारण आपण आपली साधना किती प्रामाणिकपणाने करत आहोत यावर साधनेची यशस्विता अवलंबून असते. तेव्हा श्रीअरविंद व श्रीमाताजी यांना अभिप्रेत असणारा प्रामाणिकपणा म्हणजे नेमके काय, तो अंगी कसा बाणवता येतो, यासंबंधीचा विचार येथे केला आहे. प्रामाणिकपणाचे साधनेतील स्थान किती महत्त्वाचे आहे, तसेच अप्रामाणिकपणाचे निर्मूलन कसे करावे या मुद्द्यांचाही विचार आपण करणार आहोत.
उद्यापासून सुरू होणाऱ्या ‘प्रामाणिकपणा’ या मालिकेचे आपण नेहमीप्रमाणेच स्वागत कराल अशी आशा आहे.
– संपादक,
अभीप्सा मराठी मासिक
(फक्त कर्मफलच नव्हे तर, संपूर्ण कर्मच ईश्वराला समर्पित केले पाहिजे. किंबहुना आपल्या माध्यमातून ती ईश्वरी…
साधक : प्रसन्नचित्ताने ईश्वराला शरण कसे जायचे, ते आम्हाला सांगाल का? श्रीमाताजी : ती शरणागती…
व्यक्तित्वाची घडण व्हावी यासाठी अहंकाराची आवश्यकता होती. पण म्हणूनच त्याचा विनाश हा तितकाच अवघड असतो.…
(एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) श्रीमाताजींच्या दिशेने अभिमुख झालेले असणे आणि त्यांना आवाहन करणे हे…
मी तुम्हाला हे खात्रीपूर्वक सांगू शकते की, रूपांतरण इत्यादी गोष्टी प्राणावर सोपविल्या तर तो…
(साधकाला जर जादुटोणा वगैरे गोष्टींचा धोका असेल तर काय करावे, अशा आशयाचा प्रश्न एका…