(श्रीअरविंद यांनी एका साधकाला केलेले मार्गदर्शन…)
तुमचे मन अपेक्षांनी आणि इच्छांनी अतिव्याप्त आहे. साधना करणे शक्य झाले पाहिजे असे जर तुम्हाला वाटत असेल तर, तुम्ही अपेक्षा आणि इच्छा या गोष्टी तुमच्यामधून काढून टाकल्या पाहिजेत आणि अविचलता, निरपेक्षता, साधेपणा आणि समर्पण या गोष्टी तुम्ही शिकल्या पाहिजेत. सर्वप्रथम तुम्ही याच गोष्टी संपादन केल्या पाहिजेत. बाकीच्या गोष्टी नंतर येतील; कारण (अविचलता, निरपेक्षता, साधेपणा आणि समर्पण) या गोष्टीच साधनेचा खरा पाया आहेत.
– श्रीअरविंद (CWSA 29 : 139)
(तुम्ही जर प्रामाणिक नसाल तर तुमची प्रगती कधीच होऊ शकणार नाही, या नियमाबद्दल श्रीमाताजींनी काही…
"बालकाने नेहमी काय लक्षात ठेवले पाहिजे? त्याने निरपवाद प्रामाणिकपणाची आवश्यकता मनावर ठसवली पाहिजे. सत्याच्या अंतिम…
साधक : आत्मवंचनेला (स्वतःची फसवणूक करणे, Self-deception) हजार तोंडं असतात आणि आमच्यामध्ये दडून बसण्याचे तिचे…
व्यक्तीच्या अंतरंगामध्ये जोपर्यंत आंतरिक संघर्षाची शक्यता असते तोपर्यंत तिच्यामध्ये अजूनही काही अंशी अप्रामाणिकपणा शिल्लक…
ईश्वरी साहाय्य मिळण्यासाठी प्रामाणिकपणाचा एक कणदेखील पुरेसा असतो. व्यक्तीला एखाद्या समस्येवर खरोखरच उत्तर हवे असेल…
प्रामाणिकपणा हा जगामधील इतका दुर्मिळ गुण आहे की, जेव्हा एखाद्या व्यक्तीमध्ये तो गुण आढळून येतो…