(श्रीअरविंद यांनी एका श्रीकृष्ण-भक्ताला केलेले मार्गदर्शन…)
तुम्ही श्रीकृष्णासमीप साधेसरळपणाने का जात नाही? त्यासाठीचा साधासरळ मार्ग म्हणजे त्याच्यावर विश्वास ठेवायचा. तुम्ही प्रार्थना केलीत तर ती प्रार्थना श्रीकृष्ण ऐकतो यावर विश्वास ठेवा. तुम्हाला त्याच्याकडून प्रतिसाद मिळण्यास वेळ लागत असला तरी, तो सारे काही जाणतो आणि तो तुमच्यावर प्रेम करतो यावर विश्वास ठेवा. आणि (तुम्हाला कधी प्रतिसाद द्यायचा त्या) वेळेची निवड करण्याबाबत तो सर्वाधिक सूज्ञ आहे, याची खात्री बाळगा.
परंतु त्या दरम्यान, तुम्ही शांतपणे तुमची भूमी (आधार) स्वच्छ करा. म्हणजे जेव्हा तो येईल तेव्हा त्याला काट्याकुट्यामधून, दगडधोंड्यांमधून वाट काढावी लागणार नाही. हे माझे सांगणे आहे आणि मी काय सांगत आहे याची मला पूर्ण जाणीव आहे. कारण तुम्ही ज्या अडचणी सांगत आहात त्या सर्व मानवी अडीअडचणींची, संघर्षांची मला पूर्णपणे जाणीव आहे आणि त्यावरील उपायही मला माहीत आहेत. त्यामुळे, संघर्ष व अडीअडचणी ज्यामुळे कमी होतील, त्यांचा कालावधी ज्यामुळे कमी होईल अशा गोष्टींवर म्हणजे आंतरात्मिक वळण, श्रद्धा, साधासरळ आणि परिपूर्ण विश्वास व भरवसा या गोष्टींवर मी नेहमी भर देत असतो.
– श्रीअरविंद (CWSA 29 : 487-488)
(श्रीअरविंद यांनी एका साधकाला केलेले मार्गदर्शन...) तुमचे मन अपेक्षांनी आणि इच्छांनी अतिव्याप्त आहे. साधना…
(श्रीअरविंद लिखित पत्रामधून...) तुम्हाला तुमच्या प्राणाचे शुद्धीकरण करायचे असेल तर, खोटेपणाबरोबर, मिथ्यत्वाबरोबर तुमचा प्राण जी…
(श्रीअरविंद लिखित पत्रामधून...) आध्यात्मिक अनुभव यावेत म्हणून तुम्ही प्रयत्न करू नका. त्यासाठी तुमची अजून तयारी…
असे म्हटले जाते की, “जेव्हा व्यक्ती सर्व वासनाविकारांपासून मुक्त होते तेव्हा ती अनिवार्यपणे अनंत अशा…
“ज्याच्याकडे स्वतःच्या मालकीचे काहीच नसते तो आनंदी असतो,” असे म्हटले जाते तेव्हा त्याचा अर्थ असा…
(उत्तरार्ध) आंतरिक ‘सूर्य’ शोधण्यासाठी तुम्ही अंतरंगामध्ये पुरेसे खोलवर गेले पाहिजे, त्या सूर्याच्या तेजोप्रवाहामध्ये स्वतःला प्रवाहित…