(श्रीअरविंद यांनी एका श्रीकृष्ण-भक्ताला केलेले मार्गदर्शन…)
तुम्ही श्रीकृष्णासमीप साधेसरळपणाने का जात नाही? त्यासाठीचा साधासरळ मार्ग म्हणजे त्याच्यावर विश्वास ठेवायचा. तुम्ही प्रार्थना केलीत तर ती प्रार्थना श्रीकृष्ण ऐकतो यावर विश्वास ठेवा. तुम्हाला त्याच्याकडून प्रतिसाद मिळण्यास वेळ लागत असला तरी, तो सारे काही जाणतो आणि तो तुमच्यावर प्रेम करतो यावर विश्वास ठेवा. आणि (तुम्हाला कधी प्रतिसाद द्यायचा त्या) वेळेची निवड करण्याबाबत तो सर्वाधिक सूज्ञ आहे, याची खात्री बाळगा.
परंतु त्या दरम्यान, तुम्ही शांतपणे तुमची भूमी (आधार) स्वच्छ करा. म्हणजे जेव्हा तो येईल तेव्हा त्याला काट्याकुट्यामधून, दगडधोंड्यांमधून वाट काढावी लागणार नाही. हे माझे सांगणे आहे आणि मी काय सांगत आहे याची मला पूर्ण जाणीव आहे. कारण तुम्ही ज्या अडचणी सांगत आहात त्या सर्व मानवी अडीअडचणींची, संघर्षांची मला पूर्णपणे जाणीव आहे आणि त्यावरील उपायही मला माहीत आहेत. त्यामुळे, संघर्ष व अडीअडचणी ज्यामुळे कमी होतील, त्यांचा कालावधी ज्यामुळे कमी होईल अशा गोष्टींवर म्हणजे आंतरात्मिक वळण, श्रद्धा, साधासरळ आणि परिपूर्ण विश्वास व भरवसा या गोष्टींवर मी नेहमी भर देत असतो.
– श्रीअरविंद (CWSA 29 : 487-488)
(तुम्ही जर प्रामाणिक नसाल तर तुमची प्रगती कधीच होऊ शकणार नाही, या नियमाबद्दल श्रीमाताजींनी काही…
"बालकाने नेहमी काय लक्षात ठेवले पाहिजे? त्याने निरपवाद प्रामाणिकपणाची आवश्यकता मनावर ठसवली पाहिजे. सत्याच्या अंतिम…
साधक : आत्मवंचनेला (स्वतःची फसवणूक करणे, Self-deception) हजार तोंडं असतात आणि आमच्यामध्ये दडून बसण्याचे तिचे…
व्यक्तीच्या अंतरंगामध्ये जोपर्यंत आंतरिक संघर्षाची शक्यता असते तोपर्यंत तिच्यामध्ये अजूनही काही अंशी अप्रामाणिकपणा शिल्लक…
ईश्वरी साहाय्य मिळण्यासाठी प्रामाणिकपणाचा एक कणदेखील पुरेसा असतो. व्यक्तीला एखाद्या समस्येवर खरोखरच उत्तर हवे असेल…
प्रामाणिकपणा हा जगामधील इतका दुर्मिळ गुण आहे की, जेव्हा एखाद्या व्यक्तीमध्ये तो गुण आढळून येतो…