साधना, योग आणि रूपांतरण – २०१
व्यक्ती जर नेहमीच उच्चतर चेतनेमध्ये राहू शकली तर, ते अधिक चांगले असते. परंतु मग व्यक्ती नेहमीच तिथे का राहत नाही? कारण निम्नतर चेतना ही अजूनही प्रकृतीचा भाग आहे आणि ती चेतना तुम्हाला स्वतःच्या दिशेने खाली खेचत राहते. पण समजा निम्नतर चेतनाच रूपांतरित झाली तर, ती एक प्रकारे उच्चतर चेतनेचाच भाग बनते आणि मग खाली खेचण्यासाठी निम्न असे काही शिल्लकच राहात नाही.
मन, प्राण आणि शरीर यांच्यामध्ये उच्चतर चेतना किंवा उच्चतर प्रकृती उतरविणे आणि तिने निम्नतर चेतनेची जागा घेणे म्हणजे ‘रूपांतरण’.
खऱ्या आत्म्याची एक उच्चतर चेतना असते, की जी आध्यात्मिक असते; ती ऊर्ध्वस्थित असते. एखाद्या व्यक्तीने जर त्या चेतनेमध्ये आरोहण केले तर, जेवढा काळ ती व्यक्ती तेथे असते तेवढा काळ ती मुक्त असते. परंतु ती व्यक्ती जर पुन्हा मन, प्राण आणि शरीरामध्ये उतरली किंवा त्यांचा उपयोग करू लागली आणि त्या व्यक्तीने जर जीवनाशी संबंध कायम ठेवला – अर्थात तिला तसे करावेच लागते – तर अशावेळी ती व्यक्ती एकतर खाली म्हणजे (मन, प्राण, शरीरामध्ये) उतरून, सामान्य चेतनेमध्ये राहून जीवन जगू लागते किंवा मग असेही घडू शकते की, ती व्यक्ती आत्मस्थित राहूनच मन, प्राण आणि शरीर यांचा उपयोग करू लागते. या अवस्थेतील व्यक्तीला मन, प्राण आणि शरीरादी साधनांच्या अपूर्णतांना सामोरे जावे लागते आणि या साधनांमध्ये सुधारणा घडवून आणावी लागते. आणि ती सुधारणा फक्त ‘रूपांतरणा’द्वारेच घडविणे शक्य असते.
– श्रीअरविंद (CWSA 30 : 422-423)
(अगदी बारीकसारीक आध्यात्मिक अनुभवामुळे हुरळून जाणाऱ्या नवोदित साधकांना श्रीमाताजी सांगत आहेत...) तुम्हाला ईश्वरी अवतरणाचा…
“तुम्ही ईश्वरी शक्तीसमोर खुले व्हा म्हणजे तुम्हाला ईश्वरी शक्ती प्राप्त होईल,” असे तुम्हाला सांगण्यात…
(एका साधकाला स्वप्नामध्ये जे दिसले आहे त्यावरून दिव्य प्रकाश स्वीकारण्यासाठी तो सक्षम आहे असे दिसते,…
(श्रीअरविंदांनी एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) तुमच्या अडचणींना हाताळण्यात आणि तुमच्यावर अपप्रवृत्तींचा जो हल्ला होत आहे…
(श्रीअरविंद लिखित पत्रामधून...) ‘शक्तीला प्रवेश करू द्या,’ असे मी जेव्हा तुम्हाला लिहिले तेव्हा त्याचा अर्थ…
(श्रीअरविंद लिखित एका पत्रामधून...) ‘क्ष’ हा अवाजवी तामसिक, अक्रिय झाला आहे. तो प्रत्येक गोष्टीलाच खुला…