साधना, योग आणि रूपांतरण – १३३
तुम्ही कर्म करत असतानाच फक्त तुमच्या कर्माचा विचार करा, त्याचा विचार आधीही करू नका किंवा ते कर्म पूर्ण झाल्यानंतरही करू नका. जे कर्म पूर्ण झाले आहे त्याकडे तुमच्या मनाला परत फिरू देऊ नका. कारण ते कर्म भूतकाळाचा भाग झालेले असते आणि त्याचा पुनःपुन्हा विचार करणे हा शक्तीचा अपव्यय असतो. जे कर्म करायचे आहे त्यासंबंधी अटकळ बांधण्यामध्ये तुमच्या मनाला उगाच आधीपासूनच शीणवू नका. मनाच्या या दोन सवयी त्याच्या गतकालीन कार्यप्रणालीचा भाग असतात, या सवयी टाकण्यासाठी रूपांतरकारी ‘शक्ती’ दबाव टाकत असते; परंतु शारीर-मनाने त्या सवयींना चिकटून राहणे हे तुमच्या ताणतणावाचे आणि थकव्याचे कारण असते. तुमच्यामध्ये कार्यरत असणारी ‘शक्ती’ त्या कर्माच्या वेळी त्याकडे लक्ष पुरवेल. मनाच्या कार्याची आवश्यकता असेल तेव्हाच तुमच्या मनाला त्याची कृती करू द्यायची हे जर तुम्ही लक्षात ठेवू शकलात तर तुमचा ताण हलका होईल आणि (कालांतराने) निघून जाईल. खरंतर, अतिमानसिक क्रियेने (तुमच्या) शारीर-मनाचा ताबा घेऊन, त्यामध्ये दिव्य ‘प्रकाशा’ची उत्स्फूर्त कृती करण्यापूर्वीची ही संक्रमणशील अवस्था असते.
– श्रीअरविंद (CWSA 29 : 287)
अभीप्सा ही बहुधा नेहमीच चैत्य पुरुषाची (psychic being) अभिव्यक्ती असते. चैत्य पुरुष म्हणजे आपल्यातील असा…
ईश्वराविषयीची अभीप्सा हीच पहिली आवश्यक गोष्ट आहे. ती असेल तर पुढची आवश्यक गोष्ट म्हणजे, या…
जर इच्छावासनांना नकार दिला गेला व त्यांनी व्यक्तीच्या विचार, भावभावना, कृती यांच्यावर वर्चस्व गाजवणे बंद…
आपण प्रथम कोणती गोष्ट केली पाहिजे? तर ती म्हणजे, आपण स्वत:चे अस्तित्व घडवले पाहिजे…
(उत्तरार्ध...) बाह्य रूपाकारालाच जखडून राहणे आणि शरीर म्हणजेच ‘मी’ आहे असे समजणे ही व्यक्तीची…
तुम्हाला जर आत्म्याचा शोध घ्यायचा असेल तर तुम्हाला तुमच्या अंतरंगात खोलवर उतरले पाहिजे. तुम्ही पृष्ठवर्ती…