साधना, योग आणि रूपांतरण – ५०
साधक : मी सध्या ध्यानासाठी जेवढा वेळ देतो त्यापेक्षा अधिक वेळ देणे माझ्यासाठी योग्य ठरेल का, हे मला तुमच्याकडून जाणून घ्यायचे आहे. सकाळी आणि संध्याकाळी मिळून मी सुमारे दोन तास ध्यानामध्ये व्यतीत करतो. मात्र अजूनही मी ध्यान करण्यामध्ये यशस्वी झालेलो नाही. माझे शारीर-मन त्यामध्ये खूप व्यत्यय आणते.. ते शांत व्हावे आणि माझा चैत्य पुरुष (psychic being) अग्रभागी यावा, अशी मी तुम्हाला प्रार्थना करतो. माझे मन एखाद्या वेड्या यंत्रासारखे कार्यरत असते आणि हृदय मात्र एखाद्या दगडासारखे पडलेले असते आणि हे पाहणे माझ्यासाठी खूप वेदनादायी असते. माताजी, माझ्या हृदयात मला सदोदित तुमची उपस्थिती अनुभवास यावी, अशी कृपा करावी.
श्रीमाताजी : ध्यानाबद्दल अंतरंगातून जर उत्स्फूर्तपणे तळमळ वाटत नसेल आणि तरीही ध्यान करायचे हा मनाचा स्वैर (arbitrary) निर्णय असेल तर (फक्त) ध्यानाच्या कालवाधीमध्ये वाढ करणे हे काही फारसे उपयुक्त नसते. माझे साहाय्य, प्रेम आणि आशीर्वाद नेहमीच तुमच्या पाठीशी आहेत.
*
ध्यानासाठी ठरावीक तास निश्चित करण्यापेक्षा, सातत्याने एकाग्रतेचा आणि अंतर्मुख दृष्टिकोन बाळगणे हे अधिक महत्त्वाचे आहे.
– श्रीमाताजी (CWM 14 : 52-53)
(एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) ईश्वरी कृपेबद्दल कोणतीच शंका असू शकत नाही. मनुष्य जर प्रामाणिक…
अध्यात्म-साधनेसाठी प्रामाणिकपणा अगदी अत्यावश्यक असतो आणि कुटिलता ही कायमस्वरूपी अडथळा असते. सात्त्विक प्रवृत्ती ही…
(एका साधकाची अशी समजूत झाली आहे की, त्याच्यामध्ये असलेल्या अपूर्णतांमुळे तो योगमार्गासाठी अपात्र आहे.…
पूर्णयोगाच्या मार्गावरून वाटचाल करण्यासाठी तुमच्यामध्ये निर्भय शौर्य असणे आवश्यक आहे. तुम्ही भीतीच्या क्षुल्लक, दुर्बल…
तुमची इच्छा नसतानासुद्धा तुमच्यामध्ये जेव्हा एखादा आवेग निर्माण होतो तेव्हा लगेचच एक गोष्ट तुम्ही…
तुम्ही समर्पणाचा मार्ग पूर्णतया आणि प्रामाणिकपणे स्वीकारलात तर मग कोणताही धोका किंवा कोणतीही गंभीर…