साधना, योग आणि रूपांतरण – १८ (भाग ०२)
ध्यान करणाऱ्या काही लोकांपैकी काही जण असे असतात की ज्यांना खरोखर ध्यान कसे करायचे हे माहीत असते आणि ते कोणत्या एखाद्या संकल्पनेवर नाही तर, शांतीमध्ये, आंतरिक ध्यानामध्ये मन एकाग्र करत असत आणि त्याद्वारे ‘ईश्वरा’शी सायुज्य पावण्याच्या स्थितीपर्यंतसुद्धा ते जाऊन पोहोचत असत, असे त्यांचे म्हणणे असायचे आणि हे अगदी बरोबर आहे.
आणखीही काही जण असे असतात, अगदी थोडे जण, पण ते कोणत्यातरी एखाद्या संकल्पनेचे अगदी तंतोतंत अनुसरण करू शकतात आणि त्या संकल्पनेचा अर्थ काय तो नेमकेपणाने जाणून घेण्याचा प्रयत्न करतात, हे सुद्धा योग्य आहे.
(पण) बऱ्याचवेळा लोक जेव्हा एकाग्रता साधायचा प्रयत्न करत असतात तेव्हा ते एक प्रकारच्या अर्धवट निद्रेमध्ये शिरतात आणि ती अत्यंत तामसिक स्थिती असते. ते जणूकाही एक प्रकारची जड, सुस्त गोष्ट बनून जातात, त्यांचे मन निष्क्रिय झालेले असते, भावना सुस्त झालेल्या असतात आणि शरीर अचल झालेले असते. अशा स्थितीत ते तास न् तास बसून राहू शकतात कारण आळशीपणा, जडता यांच्यापेक्षा अधिक टिकाऊ दुसरे काहीच नसते! मी हे आत्ता तुम्हाला जे काही सांगत आहे, ते अनुभवाच्या आधारे सांगत आहे; मी ज्यांना ज्यांना भेटले आहे अशा लोकांचे हे अनुभव आहेत. आणि अशी लोकं जेव्हा त्यांच्या ध्यानामधून बाहेर यायची, तेव्हा त्यांना खरोखरच प्रामाणिकपणे असे वाटायचे की त्यांनी काहीतरी फार मोठी गोष्ट केली आहे. परंतु ते फक्त जडत्व आणि अचेतनेमध्ये गेलेले असायचे. (क्रमशः)
– श्रीमाताजी (CWM 05 : 41-42)
“ज्याच्याकडे स्वतःच्या मालकीचे काहीच नसते तो आनंदी असतो,” असे म्हटले जाते तेव्हा त्याचा अर्थ असा…
(उत्तरार्ध) आंतरिक ‘सूर्य’ शोधण्यासाठी तुम्ही अंतरंगामध्ये पुरेसे खोलवर गेले पाहिजे, त्या सूर्याच्या तेजोप्रवाहामध्ये स्वतःला प्रवाहित…
पृथ्वीवरील जीवन परिपूर्ण करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे या जीवनाकडे इतक्या उंचीवरून पाहायचे की, जेथून व्यक्तीला…
हृदयापासून असलेली अभीप्सा आणि (परमेश्वराचा) अंत:करणपूर्वक केलेला साधा, सरळ, प्रामाणिक धावा ही एक अतिशय महत्त्वाची…
तुमचे वैयक्तिक मोल कितीही असू दे किंवा तुम्हाला व्यक्तिगतरित्या कोणताही साक्षात्कार झालेला असू दे, पहिला…
आपल्या 'मी'ला अस्तित्व नसून, केवळ परम चेतना, परम संकल्पशक्ती हीच अस्तित्वात आहे, हे जाणणे यामध्ये…