आत्मशोधाच्या पाऊलवाटेवर… (२०)
जीवनाचा सिद्धान्त म्हणून जो सिद्धान्त मी स्थापित करू इच्छितो, तो आध्यात्मिक आहे. नैतिकतेचा प्रश्न हा मानवी मनाचा व प्राणाचा प्रश्न आहे. आणि नैतिकता ही चेतनेच्या कनिष्ठ स्तराशी संबंधित असते. त्यामुळे नैतिक पायावर आध्यात्मिक जीवनाची उभारणी करता येत नाही. ही उभारणी आध्यात्मिक अधिष्ठानावरच करणे आवश्यक असते. आध्यात्मिक मनुष्य हा अनैतिक असला पाहिजे असा याचा अर्थ नाही, मात्र नैतिक नियमापेक्षा आचरणाचे अन्य कोणते नियमच नसतात असेही नाही. आध्यात्मिक चेतनेच्या कृतीचे नियम नैतिकतेहून कनिष्ठ स्तरावरील नसतात; तर ते अधिक उच्च स्तरावरील असतात. ते नियम ‘ईश्वराशी असलेल्या ऐक्यावर आधारित असतात, त्यांचा अधिवास ‘दिव्य चेतने’मध्ये असतो आणि त्यांची कृती ही ‘ईश्वरी इच्छे’च्या आज्ञापालनावर आधारित असते.
– श्रीअरविंद (CWSA 28 : 422-423)
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३९ (पूर्वार्ध) श्रद्धा ही कोणत्या अनुभवावर (किंवा प्रचितीवर) अवलंबून नसते. ती अनुभवाच्या…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३८ (श्रीअरविंद लिखित पत्रामधून...) अंधश्रद्धा या शब्दाला वास्तविक तसा काहीच अर्थ नाही.…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३७ श्रद्धा ही ज्ञानानंतर नव्हे तर, त्या आधीपासूनच अस्तित्वात असणारी गोष्ट आहे.…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३६ जेथे चांगल्या इच्छा असतात तेथे वाईट इच्छा देखील येणार. पूर्णयोगामध्ये संकल्प…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३५ (एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) तुम्ही जे काही करत आहात त्यामध्ये, म्हणजे…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३४ अभीप्सेच्या उत्कटतेमुळे अनुभूतीमध्ये सघनता निर्माण होते आणि वारंवार आलेल्या सघन अनुभूतीमुळे…