आत्मशोधाच्या पाऊलवाटेवर… (१४)
(एका साधकाने ‘मी लग्न करू का?’ असा प्रश्न श्रीअरविंद व श्रीमाताजी यांना विचारला होता, तेव्हा त्याच्या लग्नास संमती देण्यात आली. ती का दिली याचे कारण श्रीअरविंदांनी त्याला पत्राने कळविले आहे. त्या पत्रातील हा अंशभाग…)
आध्यात्मिक जीवनासाठीची संपूर्ण तयारी होण्यापूर्वीच व्यक्तीने लौकिक जीवनाचा त्याग करणे उपयोगाचे नाही. असे करणे म्हणजे विविध घटकांमधील (मन, प्राण, शरीर यांमधील) संघर्षाला आमंत्रण देऊन, तो टोकाला नेऊन त्याला तीव्र करण्यासारखे आहे आणि ते पेलण्याची (तुमच्या) प्रकृतीची अजून तयारी झालेली नाही.
तुम्ही आध्यात्मिक ध्येय नजरेसमोर ठेवून, त्याद्वारे कर्मयोगाच्या वृत्तीने, क्रमाक्रमाने, तुमच्या जीवनाचे सुशासन करण्याचा प्रयत्न करत, तुमच्यामधील प्राणिक घटकांना काही अंशी जीवनानुभवांद्वारे आणि शिस्तीद्वारे वळण लावले पाहिजे.
– श्रीअरविंद (CWSA 31 : 543)
(श्रीमाताजी येथे शिक्षकांना मार्गदर्शन करत आहेत. परंतु व्यापक अर्थाने ते पालकांनाही उपयुक्त ठरू शकेल असे…
जीवनऋतू - १७ (मुलांचे संगोपन कसे केले पाहिजे हे श्रीमाताजींनी सांगितले आहे आणि ते आपण…
(लहान मुलांच्या स्वप्नवत कल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी पालकांनी त्यांना प्रोत्साहन द्यावे, हे श्रीमाताजींनी सांगितले आहे.…
उत्तम स्थितीत जन्माला आलेल्या मुलाच्या म्हणजे ज्याच्या अंतरंगामध्ये एक सचेत चैत्य पुरुष (psychic being) असतो…
साधारणपणे शंभर वर्षे किंवा त्याहूनही अधिक काळ समस्त मानवजात एका आजाराने ग्रासली आहे आणि तो…
व्यक्तीने कायम बौद्धिकरित्या नव्हे तर, मानसशास्त्रीय दृष्टीने देखील शिक्षण घेतले पाहिजे. व्यक्तीने आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या दृष्टीने…