आत्मशोधाच्या पाऊलवाटेवर… (१४)
(एका साधकाने ‘मी लग्न करू का?’ असा प्रश्न श्रीअरविंद व श्रीमाताजी यांना विचारला होता, तेव्हा त्याच्या लग्नास संमती देण्यात आली. ती का दिली याचे कारण श्रीअरविंदांनी त्याला पत्राने कळविले आहे. त्या पत्रातील हा अंशभाग…)
आध्यात्मिक जीवनासाठीची संपूर्ण तयारी होण्यापूर्वीच व्यक्तीने लौकिक जीवनाचा त्याग करणे उपयोगाचे नाही. असे करणे म्हणजे विविध घटकांमधील (मन, प्राण, शरीर यांमधील) संघर्षाला आमंत्रण देऊन, तो टोकाला नेऊन त्याला तीव्र करण्यासारखे आहे आणि ते पेलण्याची (तुमच्या) प्रकृतीची अजून तयारी झालेली नाही.
तुम्ही आध्यात्मिक ध्येय नजरेसमोर ठेवून, त्याद्वारे कर्मयोगाच्या वृत्तीने, क्रमाक्रमाने, तुमच्या जीवनाचे सुशासन करण्याचा प्रयत्न करत, तुमच्यामधील प्राणिक घटकांना काही अंशी जीवनानुभवांद्वारे आणि शिस्तीद्वारे वळण लावले पाहिजे.
– श्रीअरविंद (CWSA 31 : 543)
(एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) ईश्वरी कृपेबद्दल कोणतीच शंका असू शकत नाही. मनुष्य जर प्रामाणिक…
अध्यात्म-साधनेसाठी प्रामाणिकपणा अगदी अत्यावश्यक असतो आणि कुटिलता ही कायमस्वरूपी अडथळा असते. सात्त्विक प्रवृत्ती ही…
(एका साधकाची अशी समजूत झाली आहे की, त्याच्यामध्ये असलेल्या अपूर्णतांमुळे तो योगमार्गासाठी अपात्र आहे.…
पूर्णयोगाच्या मार्गावरून वाटचाल करण्यासाठी तुमच्यामध्ये निर्भय शौर्य असणे आवश्यक आहे. तुम्ही भीतीच्या क्षुल्लक, दुर्बल…
तुमची इच्छा नसतानासुद्धा तुमच्यामध्ये जेव्हा एखादा आवेग निर्माण होतो तेव्हा लगेचच एक गोष्ट तुम्ही…
तुम्ही समर्पणाचा मार्ग पूर्णतया आणि प्रामाणिकपणे स्वीकारलात तर मग कोणताही धोका किंवा कोणतीही गंभीर…