भारत – एक दर्शन १६
(भारतीय धर्म सर्वोच्च आणि व्यापक अशा तीन आध्यात्मिक अनुभूतींवर, तीन मूलभूत संकल्पनांवर आधारलेला आहे. त्यातील दोन गोष्टींचा विचार आत्तापर्यंत झाला. आता तिसरी संकल्पना पाहू.)
भारतीय धर्माला आधारभूत असणारी तिसरी अत्यंत परिणामकारक संकल्पना ही आंतरिक आध्यात्मिक जीवनाला अतिशय गती देणारी आहे. ज्याप्रमाणे ‘परमेश्वरा’शी किंवा ‘ईश्वरा’शी वैश्विक चेतनेद्वारे संपर्क साधता येतो किंवा सर्व आंतरिक व बाह्य ‘प्रकृती’चा भेद करून संपर्क साधता येतो, त्याचप्रमाणे ‘तो ईश्वर’ प्रत्येक व्यक्तिभूत आत्म्याला स्वत:मध्येच, म्हणजे त्याच्या स्वत:च्या आध्यात्मिक भागामध्ये भेटू शकतो. कारण त्यामध्ये असे काहीतरी असते की, जे त्या ‘ईश्वरी अस्तित्वा’शी, ‘सत् तत्त्वा’शी एकत्व पावणारे असते, किमान त्या दिव्य ‘ईश्वरी अस्तित्वा’शी संबंधित तरी असते; ही ती अत्यंत परिणामकारक अशी तिसरी संकल्पना आहे. आपल्या मनापासून आणि प्राणापासून हे आत्म-ज्ञान दडवून ठेवणाऱ्या ‘अज्ञाना’तून आपण बाहेर पडू शकू आणि आपल्यामध्ये वसणाऱ्या ‘दिव्यत्वा’विषयी आपण जागृत होऊ शकू अशा पद्धतीने आपण जीवन जगावे, विकसित व्हावे, हे आपले ध्येय असावे हा भारतीय धर्माचा गाभा आहे. या तीन गोष्टी एकत्र केल्या तर त्यामध्येच ‘हिंदु’ धर्म सामावलेला आहे, हेच त्याचे मूलभूत सार आहे आणि जर कोणती श्रद्धा आवश्यक असेल तर हीच ती श्रद्धा होय.
– श्रीअरविंद [CWSA 20 : 195]
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३९ (पूर्वार्ध) श्रद्धा ही कोणत्या अनुभवावर (किंवा प्रचितीवर) अवलंबून नसते. ती अनुभवाच्या…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३८ (श्रीअरविंद लिखित पत्रामधून...) अंधश्रद्धा या शब्दाला वास्तविक तसा काहीच अर्थ नाही.…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३७ श्रद्धा ही ज्ञानानंतर नव्हे तर, त्या आधीपासूनच अस्तित्वात असणारी गोष्ट आहे.…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३६ जेथे चांगल्या इच्छा असतात तेथे वाईट इच्छा देखील येणार. पूर्णयोगामध्ये संकल्प…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३५ (एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) तुम्ही जे काही करत आहात त्यामध्ये, म्हणजे…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३४ अभीप्सेच्या उत्कटतेमुळे अनुभूतीमध्ये सघनता निर्माण होते आणि वारंवार आलेल्या सघन अनुभूतीमुळे…