भारत – एक दर्शन १६
(भारतीय धर्म सर्वोच्च आणि व्यापक अशा तीन आध्यात्मिक अनुभूतींवर, तीन मूलभूत संकल्पनांवर आधारलेला आहे. त्यातील दोन गोष्टींचा विचार आत्तापर्यंत झाला. आता तिसरी संकल्पना पाहू.)
भारतीय धर्माला आधारभूत असणारी तिसरी अत्यंत परिणामकारक संकल्पना ही आंतरिक आध्यात्मिक जीवनाला अतिशय गती देणारी आहे. ज्याप्रमाणे ‘परमेश्वरा’शी किंवा ‘ईश्वरा’शी वैश्विक चेतनेद्वारे संपर्क साधता येतो किंवा सर्व आंतरिक व बाह्य ‘प्रकृती’चा भेद करून संपर्क साधता येतो, त्याचप्रमाणे ‘तो ईश्वर’ प्रत्येक व्यक्तिभूत आत्म्याला स्वत:मध्येच, म्हणजे त्याच्या स्वत:च्या आध्यात्मिक भागामध्ये भेटू शकतो. कारण त्यामध्ये असे काहीतरी असते की, जे त्या ‘ईश्वरी अस्तित्वा’शी, ‘सत् तत्त्वा’शी एकत्व पावणारे असते, किमान त्या दिव्य ‘ईश्वरी अस्तित्वा’शी संबंधित तरी असते; ही ती अत्यंत परिणामकारक अशी तिसरी संकल्पना आहे. आपल्या मनापासून आणि प्राणापासून हे आत्म-ज्ञान दडवून ठेवणाऱ्या ‘अज्ञाना’तून आपण बाहेर पडू शकू आणि आपल्यामध्ये वसणाऱ्या ‘दिव्यत्वा’विषयी आपण जागृत होऊ शकू अशा पद्धतीने आपण जीवन जगावे, विकसित व्हावे, हे आपले ध्येय असावे हा भारतीय धर्माचा गाभा आहे. या तीन गोष्टी एकत्र केल्या तर त्यामध्येच ‘हिंदु’ धर्म सामावलेला आहे, हेच त्याचे मूलभूत सार आहे आणि जर कोणती श्रद्धा आवश्यक असेल तर हीच ती श्रद्धा होय.
– श्रीअरविंद [CWSA 20 : 195]
व्यक्ती जेव्हा प्रामाणिक असते तेव्हा तिला स्वत:च्या चुका कळतात. स्वतःच्या चुकांची जाणीव नसणे, ही…
आपण ईश्वराला फसवू शकत नाही हे व्यक्तीला कळत असते, माहीत असते. अत्यंत हुशार असा…
(भाग ०४) व्यक्तीच्या अवस्थेनुसार किंवा व्यक्तीमधील विविध घटकांनुसार अप्रामाणिकपणाचे विविध प्रकार असतात, हे खरं…
(भाग ०३) अप्रामाणिकपणाच्या ज्या मूढतापूर्ण गोष्टी असतात त्या प्रत्येकाला माहीत असतात आणि मला वाटते…
भाग ०२ (व्यक्तीमध्ये जोपर्यंत पसंती-नापसंती अशी द्वंद्वे शिल्लक असतात तोपर्यंत व्यक्ती खऱ्या अर्थाने प्रामाणिक…
साधक : संपूर्णतया प्रामाणिक असणे मनुष्यमात्राला शक्य आहे का? प्रामाणिकपणामध्ये मानसिक प्रामाणिकपणा, प्राणिक प्रामाणिकपणा,…