‘देव’भूमी असलेल्या भारतामध्ये ऋषीमुनी, योगी, संतसत्पुरूष, महात्मे यांची कधीच वानवा नव्हती. त्यांच्या तपाचरणाचा प्रभाव म्हणा किंवा सत्संगाचा प्रभाव म्हणा, पण भारतामध्ये रहिवास करणाऱ्या आबालवृद्धांना जणू आध्यात्मिकतेचे बाळकडूच मिळालेले असते. परंतु त्याच्या अतिपरिचयामुळे असेल कदाचित पण सामान्य जनांमध्ये ‘आध्यात्मिकता’ या गोष्टीबद्दल विविध समजुती असलेल्या आढळतात. त्यांची सत्यासत्यता पारखून, श्रीअरविंद आपल्याला आध्यात्मिकता म्हणजे काय आणि काय नाही, हे खुलासेवार स्पष्ट करतात.
एकदा आध्यात्मिकता म्हणजे काय हे समजले की, त्याला जोडूनच पुढचा प्रश्न येतो. आणि तो म्हणजे आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये आध्यात्मिकतेचे अनुसरण कसे करायचे. याबद्दलचे मार्गदर्शनही उद्यापासून सुरु होत असलेल्या ‘आध्यात्मिकता’ या मालिकेमध्ये वाचकांना लाभेल, असा विश्वास वाटतो.
संपादक, ‘अभीप्सा’ मराठी मासिक
(एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) ईश्वरी कृपेबद्दल कोणतीच शंका असू शकत नाही. मनुष्य जर प्रामाणिक…
अध्यात्म-साधनेसाठी प्रामाणिकपणा अगदी अत्यावश्यक असतो आणि कुटिलता ही कायमस्वरूपी अडथळा असते. सात्त्विक प्रवृत्ती ही…
(एका साधकाची अशी समजूत झाली आहे की, त्याच्यामध्ये असलेल्या अपूर्णतांमुळे तो योगमार्गासाठी अपात्र आहे.…
पूर्णयोगाच्या मार्गावरून वाटचाल करण्यासाठी तुमच्यामध्ये निर्भय शौर्य असणे आवश्यक आहे. तुम्ही भीतीच्या क्षुल्लक, दुर्बल…
तुमची इच्छा नसतानासुद्धा तुमच्यामध्ये जेव्हा एखादा आवेग निर्माण होतो तेव्हा लगेचच एक गोष्ट तुम्ही…
तुम्ही समर्पणाचा मार्ग पूर्णतया आणि प्रामाणिकपणे स्वीकारलात तर मग कोणताही धोका किंवा कोणतीही गंभीर…