ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

Categories: संकलन

प्रत्येक धर्माचे योगदान

प्रत्येक धर्मामुळेच मानवजातीला मदत झाली आहे.

‘पेगानिझम’ मुळे (रोमन साम्राज्यातील शेतकऱ्यांचा धर्म) माणसाच्या सौंदर्याच्या प्रकाशामध्ये, जीवनाच्या व्यापकतेमध्ये आणि उंचीमध्ये भर पडली आहे; बहुआयामी पूर्णत्व हे ध्येय ठरविण्यास त्याला मदत झाली आहे. ख्रिश्चन धर्माने मानवाला दिव्य प्रेम आणि औदार्य या विषयी काही दृष्टी प्रदान केली आहे. बुद्धधर्माने मानवाला अधिक प्रज्ञावान, अधिक सौम्य, अधिक शुद्ध बनविण्याचा उमदा मार्ग दाखविला आहे. ज्यू आणि इस्लाम धर्माने आपल्या कार्यामध्ये धार्मिक-निष्ठावान कसे असले पाहिजे आणि ईश्वराप्रत उत्साहपूर्ण भक्ती कशी असली पाहिजे हे दाखविले आहे. हिंदुधर्माने अत्यंत विशाल आणि गाढ अशा आध्यात्मिक शक्यता मानवापुढे खुल्या केल्या आहेत.

ईश्वरविषयक हे सर्व दृष्टिकोन अंगीकारले गेले आणि एकमेकांमध्ये प्रक्षेपित झाले तर किती चांगले होईल; पण या मार्गामध्ये बौद्धिक सिद्धान्त आणि सांप्रदायिक अहंवाद आडवे येतात. आजवर अनेक धर्मांमुळे असंख्य ‘जीव’ तरून गेले आहेत पण, यांपैकी कोणीही ‘मानवजाती’चे आध्यात्मिकीकरण करू शकलेला नाही. यासाठी कोणत्या एका पंथाची, कोणत्या एका संप्रदायाची नव्हे तर, आध्यात्मिक आत्म-उत्क्रांतीच्या दिशेने केलेल्या सातत्यपूर्ण आणि सर्वसमावेशक प्रयत्नांची आवश्यकता आहे.

– श्रीअरविंद
(SABCL 16 : 394)

Latest posts by अभीप्सा मराठी मासिक (see all)
अभीप्सा मराठी मासिक

या संकेतस्थळावरील बहुतांश सर्व मजकूर हा श्रीअरविंद व श्रीमाताजी लिखित आहे, त्याचा मराठी अनुवाद अभीप्सा मासिकाने केला आहे. तसेच या मासिकातर्फेच, आकलनाच्या सोयीसाठी काही ठिकाणी चित्रे, तक्ते, आकृत्या यांचा समावेश करण्यात आलेला आहे.

Recent Posts

माणूस चिंताग्रस्त का आहे?

  (माणसाचे जीवन चिंताग्रस्त का आहे आणि त्यावर उपाय काय, हे श्रीमाताजी येथे खुलासेवार स्पष्ट…

16 hours ago

उच्चतर चेतना : प्रस्तावना

  मनुष्य हा पृथ्वीतलावरचा अंतिम टप्पा आहे, अशी बहुधा सर्वांची समजूत असते. परंतु ‘मन हा…

2 days ago

मराठी विकिपीडियावरील नोंदी

नमस्कार वाचकहो, अभीप्सा मासिक, ऑरोमराठी वेबसाईट आणि ज्योतिर्मयी मिडिया हाऊस या उपक्रमांतर्गत आपण श्रीअरविंद आणि…

3 days ago

आपल्याला काय संपादन करायचे आहे?

  असे नावीन्यपूर्ण काय आहे की, जे आपण अद्यापि साध्य केलेले नाही? आपल्याला ‘प्रेम‌’ संपादन…

4 days ago

आपले कार्य काय?

आत्तापर्यंत मनुष्याने जे संपादन केले आहे त्याचीच पुनरावृत्ती करणे हे आपले काम नाही तर, नवीन…

5 days ago

विचार-कणिका

  स्वतःच्या अक्षाभोवती फिरत राहणे हीच मानवी आत्म्याची एकमेव गती नाही. अक्षय प्रकाशमान असणाऱ्या सूर्याभोवती…

6 days ago