जिवाला जगदीश्वराकडे जाण्याच्या मार्गामध्ये जगत् आडवे येते, अशी पूर्वी समजूत असल्याने, जगताचा त्याग करून, दूर कोठेतरी अरण्यात राहून, उपासना करण्याकडे पूर्वीच्या योगाचा कल होता. परंतु आहे त्या जीवनात राहूनच, साधना, उपासना करता येते, नव्हे, तर ती तशीच केली पाहिजे असे श्रीअरविंद आणि श्रीमाताजी यांनी प्रतिपादन केले. जगाला आणि जीवनाला ते आत्ता आहे त्याच स्थितीत सोडून द्यायचे आणि केवळ वैयक्तिक ‘मुक्ती’वर लक्ष केंद्रित करायचे हे ‘पूर्णयोगा’चे उद्दिष्ट नाही. तर या पार्थिव जीवनाचेच ‘दिव्य जीवना’त परिवर्तन करण्याची भूमिका ‘पूर्णयोग’ घेतो.
‘सर्व जीवन हा योगच आहे’, हे श्रीअरविंदांचे योगसूत्र आहे. आणि त्यामुळे वैयक्तिक जीवनातील किरकोळ दैनंदिन गोष्टी म्हणून एरवी ज्यांच्याकडे दुर्लक्ष केले जात असे त्या गोष्टींकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून जातो; त्या गोष्टीसुद्धा निरीक्षणाचा, अभ्यासाचा, साधनेचा एक अविभाज्य भाग बनतात. त्या योगयुक्त होऊन कशा करायच्या, त्यासाठी मूळ भूमिकेतच कसा बदल करायचा, ‘बालक’भाव कसा धारण करायचा, कर्म करताना कोणती भूमिका असली पाहिजे, आणि मुळात जीवनच कशासाठी असते? इत्यादी मूलभूत महत्त्वाच्या प्रश्नांवर ‘सुयोग्य जीवनासाठी मार्गदर्शन’ या मालिकेतून प्रकाश टाकण्यात येणार आहे.
– संपादक, ‘अभीप्सा’ मराठी मासिक
(श्रीमाताजी येथे शिक्षकांना मार्गदर्शन करत आहेत. परंतु व्यापक अर्थाने ते पालकांनाही उपयुक्त ठरू शकेल असे…
जीवनऋतू - १७ (मुलांचे संगोपन कसे केले पाहिजे हे श्रीमाताजींनी सांगितले आहे आणि ते आपण…
(लहान मुलांच्या स्वप्नवत कल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी पालकांनी त्यांना प्रोत्साहन द्यावे, हे श्रीमाताजींनी सांगितले आहे.…
उत्तम स्थितीत जन्माला आलेल्या मुलाच्या म्हणजे ज्याच्या अंतरंगामध्ये एक सचेत चैत्य पुरुष (psychic being) असतो…
साधारणपणे शंभर वर्षे किंवा त्याहूनही अधिक काळ समस्त मानवजात एका आजाराने ग्रासली आहे आणि तो…
व्यक्तीने कायम बौद्धिकरित्या नव्हे तर, मानसशास्त्रीय दृष्टीने देखील शिक्षण घेतले पाहिजे. व्यक्तीने आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या दृष्टीने…