उच्च अपरिमित ईश्वरी कृपा
कृतज्ञता – १८
कोणते तरी संकट आल्याशिवाय लोकांना ‘ईश्वरी कृपे’च्या कार्याची जाणीवच होत नाही; म्हणजे जेव्हा एखादा अपघात घडणार असतो किंवा एखादा अपघात घडलेला असतो आणि त्यातून ते सहीसलामत वाचलेले असतात, तेव्हा लोकांना त्या कृपेची जाणीव होते. पण एखादा प्रवास किंवा तत्सम कोणता प्रसंग, जर विनाअपघात सुरळीत पार पडला, तर ती त्याहूनही अधिक उच्च अपरिमित अशी ‘ईश्वरी कृपा’ आहे, याची त्यांना कधीच जाणीव नसते. म्हणजे खरंतर, काहीही विपरित घडू नये अशा रीतीनेच तेथे सुसंवाद प्रस्थापित झालेला असतो. पण लोकांना मात्र ते अगदी सहजस्वाभाविक असल्यासारखे वाटते.
लोक आजारपणातून जेव्हा पटकन बरे होतात, तेव्हा त्यांच्याठायी कृतज्ञता असते; पण एरवी जेव्हा ते ठणठणीत बरे असतात तेव्हा त्यांना कृतज्ञ असावे असे कधीच वाटत नाही. खरंतर, हीच मोठी आश्चर्याची गोष्ट आहे !
– श्रीमाताजी
(CWM 05 : 406)
- मुलांचे संगोपन - June 14, 2026
- विजयाची खात्री - June 13, 2026
- सकारात्मक वृत्तीचा परिणाम - June 12, 2026






