सद्भावना – २६
(प्राणामध्ये (Vital) दोन प्रवृत्ती आढळतात – एक म्हणजे निराशेची आणि दुसरी अतिउत्साहाची. या दोन प्रवृत्तींना कसे हाताळावे, याविषयी चर्चा सुरू असताना, श्रीमाताजी पुढे सांगत आहेत…)
अगदी काळजीपूर्वक टाळलाच पाहिजे असा हा एक मोठा अडथळा आहे. असमाधानाचे किंवा चिडचिडेपणाचे अगदी बारीकसे लक्षण जरी आढळले तरी, लगेचच आपण आपल्या प्राणाला असे सांगितले पाहिजे की, ”माझ्या मित्रा, तू शांत राहणार आहेस, तुला जे करायला सांगितले आहे तेवढेच तू करणार आहेस, अन्यथा माझ्याशी गाठ आहे.” आणि दुसरीकडे, “आत्ताच्या आत्ता सारे काही झालेच पाहिजे,’’ असे म्हणणारा, जो अतिउत्साही (प्राण) असतो त्याला असे समजावून सांगितले पाहिजे की, “थोडा शांत हो, तुझी उत्साहशक्ती चांगलीच आहे पण ती अशी पाच मिनिटांतच वाया घालविता कामा नये. आपल्याला ती पुढेही दीर्घकाळ लागणार आहे, तिचे काळजीपूर्वक जतन कर, आणि मला जेव्हा तिची आवश्यकता भासेल तेव्हा मी स्वतःहून तुझ्या सद्भावनेला हाक देईन. तेव्हा तू सद्भावनेने परिपूर्ण आहेस हे दाखवून देशील, तू आज्ञा पाळशील, तू कुरकूर करणार नाहीस, तू विरोध करणार नाहीस, तू बंड करणार नाहीस, तू म्हणशील, ‘हो, हो. मी करीन.” तुला जेव्हा विचारण्यात येईल तेव्हा तू किंचितसा त्याग करशील आणि म्हणशील, “हो, मी अगदी मनापासून करीन.” (प्राणाच्या अतिउत्साहाला तुम्ही अशा प्रकारे आवर घातला पाहिजे.)
– श्रीमाताजी
(CWM 04 : 249)
अधीरता नेहमीच चुकीची असते. ती साधनेला साहाय्य करत नाही तर, ती अडथळे निर्माण करते. अविचल,…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४४ (श्रीअरविंद लिखित पत्रामधून...) कोणतीही अडचण आली किंवा कितीही त्रास सहन करावा…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४३ (श्रीअरविंद लिखित पत्रामधून...) साधनेमध्ये सुरुवातीच्या टप्प्यावर नेहमीच अडचणी येतात आणि त्यामुळे…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४२ (श्रीअरविंद लिखित पत्रामधून...) नामस्मरणाच्या शक्तीचा आणि संरक्षणाचा तुम्हाला अनुभव आला आहे…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४१ (मला फक्त ईश्वर दर्शनाचीच आस आहे, पण तरीही तो मला दर्शन…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४० (उत्तरार्ध) एखादी अशी गोष्ट की, जी अद्यापि आविष्कृत किंवा साध्य झालेली…