सद्भावना – २५
व्यक्ती ज्यावेळी अतिशय सतर्क आणि अतिशय प्रामाणिक असते तेव्हा, तिने हाती घेतलेल्या कामाचे किंवा ती करत असलेल्या कृतीचे मूल्य किती आहे किंवा काय आहे यासंबंधी, तिला एखादी आंतरिक पण सुस्पष्ट सूचना मिळू शकते. खरोखर, जिच्यापाशी पुरेपूर सद्भावना आहे अशी एखादी व्यक्ती असेल म्हणजे जी व्यक्ती अत्यंत प्रामाणिकपणाने, तिच्या अस्तित्वाच्या समग्र जाणिवयुक्त भागानिशी, योग्य कृती, योग्य प्रकारे करण्याची इच्छा बाळगत असेल तर नेहमीच अशा प्रकारची अंतःसूचना मिळते. कोणत्याही कारणाने का असेना पण जर का तिने कमीअधिक घातक अशी एखादी कृती करायला सुरुवात केली तर, तिला अशा प्रत्येक वेळी आज्ञा-चक्रापाशी (solar plexus) एक प्रकारच्या अस्वस्थतेची जाणीव होते. ही अस्वस्थता आक्रमक नसते, नाट्यमयरित्या काहीतरी करून आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देण्यासाठी ती बळाचा वापर करत नाही, परंतु तरीही सतर्क व्यक्तीसाठी ती अस्वस्थता अगदी सुस्पष्ट असते; ती काहीशी पश्चात्तापासारखी किंवा असहमतीसारखी असते. कधीकधी असहकार पुकारण्या इतपतदेखील या अस्वस्थतेची मजल जाऊ शकते. पण मला येथे एक गोष्ट स्पष्ट केली पाहिजे की, त्या अस्वस्थतेमध्ये कोणतीही आक्रमकता नसते, तिच्यामध्ये कोणताही क्रूर असा स्वाग्रह (self-assertion) नसतो. म्हणजे असे की, ती अस्वस्थता कोणताही गोंगाट करत नाही, इजा पोहोचवीत नाही, काहीशी बेचैनी असते इतकेच.
परंतु जर का तुम्ही तिच्याकडे दुर्लक्ष केलेत, तिच्याकडे लक्ष दिले नाहीत, तिला काही महत्त्व दिले नाहीत तर, कालांतराने ती पूर्णपणे निघून जाते आणि मग पुढे पुढे तर, अशी अस्वस्थता जाणवणेच बंद होते.
असे दुर्लक्ष झाले तर वाढत्या चुकांच्या प्रमाणात अस्वस्थता वाढण्याऐवजी, उलट, ती अस्वस्थता जाणवेनाशी होते आणि चेतना झाकोळून जाते.
पण म्हणून, हेच याचे निश्चित लक्षण आहे असे व्यक्ती म्हणू शकत नाही; कारण जर का तुम्ही ही अशा प्रकारशी लहानशी अंतःसूचना अनेक वेळा डावलली असेल, तर, कालांतराने ती सूचना येईनाशी होते. परंतु मी तुम्हाला सांगते की, अगदी प्रामाणिकपणे तुम्ही तिच्याकडे लक्ष दिलेत तर, ती अंतःसूचना एक अत्यंत खात्रीलायक आणि मोलाची मार्गदर्शक ठरते.
– श्रीमाताजी
(CWM 09 : 31-32)
(एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) ईश्वरी कृपेबद्दल कोणतीच शंका असू शकत नाही. मनुष्य जर प्रामाणिक…
अध्यात्म-साधनेसाठी प्रामाणिकपणा अगदी अत्यावश्यक असतो आणि कुटिलता ही कायमस्वरूपी अडथळा असते. सात्त्विक प्रवृत्ती ही…
(एका साधकाची अशी समजूत झाली आहे की, त्याच्यामध्ये असलेल्या अपूर्णतांमुळे तो योगमार्गासाठी अपात्र आहे.…
पूर्णयोगाच्या मार्गावरून वाटचाल करण्यासाठी तुमच्यामध्ये निर्भय शौर्य असणे आवश्यक आहे. तुम्ही भीतीच्या क्षुल्लक, दुर्बल…
तुमची इच्छा नसतानासुद्धा तुमच्यामध्ये जेव्हा एखादा आवेग निर्माण होतो तेव्हा लगेचच एक गोष्ट तुम्ही…
तुम्ही समर्पणाचा मार्ग पूर्णतया आणि प्रामाणिकपणे स्वीकारलात तर मग कोणताही धोका किंवा कोणतीही गंभीर…