ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

(इसवी सन : १८९० ते १९०६)

आपल्यामध्ये प्रेमाची, उत्साहाची, ‘भक्ती’ची कमतरता आहे का? नाही, या गोष्टी तर भारतीय प्रकृतीमध्येच रुजलेल्या आहेत, पण ‘शक्ति’च्या अभावामुळे आपण लक्ष केंद्रित करू शकत नाही, त्यांना आपण दिशा देऊ शकत नाही, एवढेच काय पण आपण त्या टिकवून देखील ठेवू शकत नाही. ‘भक्ती’ ही धगधगती ज्वाळा आहे तर, ‘शक्ती’ हे तिचे इंधन आहे. जर इंधनच अपुरे असेल तर अग्नी किती काळ टिकून राहील? एखाद्या व्यक्तीकडे सुदृढ प्रकृती असून, ती व्यक्ती जर ज्ञानप्रदीप्त, शिस्तबद्ध असेल तसेच ‘कर्मा’मुळे तिला महाकाय सामर्थ्य प्रदान करण्यात आलेले असेल; आणि त्यातूनही जर अशी व्यक्ती ईश्वरविषयक प्रेमाने आणि भक्तीने स्वत:ला उन्नत करेल, तर अशी भक्ती टिकून राहील आणि अशा व्यक्तीचा आत्मा हा ‘ईश्वरा’बरोबर सदैव ऐक्य पावलेला असेल. पण दुर्बल प्रकृतीची व्यक्ती परिपूर्ण ‘भक्ती’सारख्या महान गोष्टीचा आवेग झेलू शकण्यास फारच कमकुवत ठरते; तो एक क्षणभरासाठीच उचलला जातो, मग ती ज्वाळा थेट ‘स्वर्गा’लाच जाऊन भिडते आणि ती व्यक्ती पूर्णपणे थकून जाते, पूर्वीपेक्षाही अधिक दुर्बल बनून जाते. ज्याद्वारे सर्व जीवनव्यवहार घडत असतात ते मानवी जडद्रव्य जोपर्यंत, कमजोर आणि अल्प असते तोपर्यंत, त्यातून निर्माण होणाऱ्या आणि उत्साह व भक्ती हाच ज्यांचा प्राण आहे अशी प्रत्येक गोष्ट असफल होणे आणि भाजून निघणे, क्रमप्राप्तच आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 06-07 : 82)

श्रीअरविंद

श्री अरविंद यांची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व बंगाली भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

माणूस चिंताग्रस्त का आहे?

  (माणसाचे जीवन चिंताग्रस्त का आहे आणि त्यावर उपाय काय, हे श्रीमाताजी येथे खुलासेवार स्पष्ट…

16 hours ago

उच्चतर चेतना : प्रस्तावना

  मनुष्य हा पृथ्वीतलावरचा अंतिम टप्पा आहे, अशी बहुधा सर्वांची समजूत असते. परंतु ‘मन हा…

2 days ago

मराठी विकिपीडियावरील नोंदी

नमस्कार वाचकहो, अभीप्सा मासिक, ऑरोमराठी वेबसाईट आणि ज्योतिर्मयी मिडिया हाऊस या उपक्रमांतर्गत आपण श्रीअरविंद आणि…

3 days ago

आपल्याला काय संपादन करायचे आहे?

  असे नावीन्यपूर्ण काय आहे की, जे आपण अद्यापि साध्य केलेले नाही? आपल्याला ‘प्रेम‌’ संपादन…

4 days ago

आपले कार्य काय?

आत्तापर्यंत मनुष्याने जे संपादन केले आहे त्याचीच पुनरावृत्ती करणे हे आपले काम नाही तर, नवीन…

5 days ago

विचार-कणिका

  स्वतःच्या अक्षाभोवती फिरत राहणे हीच मानवी आत्म्याची एकमेव गती नाही. अक्षय प्रकाशमान असणाऱ्या सूर्याभोवती…

6 days ago