ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

(दिनांक : ११ एप्रिल १९०८)

राष्ट्र उभारणीसाठी स्वयंसहाय्यतेच्या तत्त्वाआधारे, आम्ही पुनरुत्थानाच्या ज्या काही योजना आखत आहोत, मग ते औद्योगिक पुनरुत्थान असो, शैक्षणिक पुनरुत्थान असो किंवा ती राजकीय पुनरुत्थानाची योजना असो ह्या सर्व योजना म्हणजे देश स्वतंत्र होण्यापूर्वी घडून यावयासच हवे अशा एका अधिक गहन पुनरुत्थानाची केवळ दुय्यम अंगे आहेत. ‘भारत माता’ आपल्याकडून कोणत्याही योजनांची, नियोजित आराखड्यांची किंवा कोणत्या पद्धतींची मागणी करत नाहीये. आपण तयार करू शकू त्यापेक्षा कितीतरी अधिक चांगल्या योजना, अधिक चांगले आराखडे, अधिक चांगल्या पद्धती ती आम्हाला देऊ करेल. ती आमच्याकडून आमची हृदये, आमची जीवने यांची मागणी करत आहे; याहून काही कमी नाही किंवा काही अधिकही नाही. ‘स्वदेशी’, ‘राष्ट्रीय शिक्षण’, ‘स्वराज्या’च्या उभारणीचा प्रयास ह्या सर्व बाबी म्हणजे तिच्याप्रत स्वत:ला समर्पित करण्याच्या केवळ अनेकानेक संधी आहेत. आपण ‘स्वदेशी’साठी किती प्रयत्न केले, आम्ही किती हुशारीने स्वराज्याची आखणी केली, आम्ही शिक्षणाची पुनर्रचना किती यशस्वितेने केली हे ती पाहणार नाही तर; आम्ही तिच्याप्रत स्वत:ला किती समर्पित केले, आम्ही आमच्यातील मूलद्रव्यं किती देऊ केली, आम्ही आमचे कष्ट, आमच्या सोयीसुविधा, आमची सुरक्षितता, आमची जीवने किती प्रमाणात देऊ केली, हे ती पाहणार आहे. पुनरुत्थान हा अक्षरश: पुनर्जन्मच असतो, आणि हा पुनर्जन्म बुद्धिने नाही, केवळ पैशाच्या मुबलकतेने नाही, केवळ धोरणांमुळे, योजनांमुळे, किंवा यंत्रणेमध्ये परिवर्तन घडविल्यानेही होत नाही तर, आम्ही आज जे काही आहोत ते सारेच्या सारे त्यागरूपी अग्निमध्ये भस्मसात करून, एक नवीन हृदय प्राप्त करून घेण्यामधून आणि ‘माते’च्या कुशीतून पुन्हा जन्माला येण्यातून होतो. स्व-परित्यागाची आमच्याकडून मागणी केली जात आहे. माता आम्हाला विचारत आहे, “तुमच्यापैकी किती जणं माझ्यासाठी जगायला तयार आहात? तुमच्यापैकी किती जणं माझ्यासाठी प्राणार्पण करायला तयार आहात?” आणि ती आमच्या उत्तराची वाट पाहात आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 06-07 : 1032-1033)

श्रीअरविंद

श्री अरविंद यांची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व बंगाली भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

प्रामाणिकपणा आणि चिकाटी

  (एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) ईश्वरी कृपेबद्दल कोणतीच शंका असू शकत नाही. मनुष्य जर प्रामाणिक…

12 hours ago

ईश्वराच्या निवासाचे दरवाजे

  अध्यात्म-साधनेसाठी प्रामाणिकपणा अगदी अत्यावश्यक असतो आणि कुटिलता ही कायमस्वरूपी अडथळा असते. सात्त्विक प्रवृत्ती ही…

1 day ago

अप्रामाणिकपणाचा अडथळा

  (एका साधकाची अशी समजूत झाली आहे की, त्याच्यामध्ये असलेल्या अपूर्णतांमुळे तो योगमार्गासाठी अपात्र आहे.…

2 days ago

पूर्णयोगाच्या मार्गावरून वाटचाल करण्यासाठी…

  पूर्णयोगाच्या मार्गावरून वाटचाल करण्यासाठी तुमच्यामध्ये निर्भय शौर्य असणे आवश्यक आहे. तुम्ही भीतीच्या क्षुल्लक, दुर्बल…

3 days ago

योगमार्गाचे अनुसरण करण्याचा निर्णय

  तुमची इच्छा नसतानासुद्धा तुमच्यामध्ये जेव्हा एखादा आवेग निर्माण होतो तेव्हा लगेचच एक गोष्ट तुम्ही…

4 days ago

योगमार्गावरून सुरक्षित वाटचाल

  तुम्ही समर्पणाचा मार्ग पूर्णतया आणि प्रामाणिकपणे स्वीकारलात तर मग कोणताही धोका किंवा कोणतीही गंभीर…

5 days ago