ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

(दिनांक : ११ एप्रिल १९०८)

राष्ट्र उभारणीसाठी स्वयंसहाय्यतेच्या तत्त्वाआधारे, आम्ही पुनरुत्थानाच्या ज्या काही योजना आखत आहोत, मग ते औद्योगिक पुनरुत्थान असो, शैक्षणिक पुनरुत्थान असो किंवा ती राजकीय पुनरुत्थानाची योजना असो ह्या सर्व योजना म्हणजे देश स्वतंत्र होण्यापूर्वी घडून यावयासच हवे अशा एका अधिक गहन पुनरुत्थानाची केवळ दुय्यम अंगे आहेत. ‘भारत माता’ आपल्याकडून कोणत्याही योजनांची, नियोजित आराखड्यांची किंवा कोणत्या पद्धतींची मागणी करत नाहीये. आपण तयार करू शकू त्यापेक्षा कितीतरी अधिक चांगल्या योजना, अधिक चांगले आराखडे, अधिक चांगल्या पद्धती ती आम्हाला देऊ करेल. ती आमच्याकडून आमची हृदये, आमची जीवने यांची मागणी करत आहे; याहून काही कमी नाही किंवा काही अधिकही नाही. ‘स्वदेशी’, ‘राष्ट्रीय शिक्षण’, ‘स्वराज्या’च्या उभारणीचा प्रयास ह्या सर्व बाबी म्हणजे तिच्याप्रत स्वत:ला समर्पित करण्याच्या केवळ अनेकानेक संधी आहेत. आपण ‘स्वदेशी’साठी किती प्रयत्न केले, आम्ही किती हुशारीने स्वराज्याची आखणी केली, आम्ही शिक्षणाची पुनर्रचना किती यशस्वितेने केली हे ती पाहणार नाही तर; आम्ही तिच्याप्रत स्वत:ला किती समर्पित केले, आम्ही आमच्यातील मूलद्रव्यं किती देऊ केली, आम्ही आमचे कष्ट, आमच्या सोयीसुविधा, आमची सुरक्षितता, आमची जीवने किती प्रमाणात देऊ केली, हे ती पाहणार आहे. पुनरुत्थान हा अक्षरश: पुनर्जन्मच असतो, आणि हा पुनर्जन्म बुद्धिने नाही, केवळ पैशाच्या मुबलकतेने नाही, केवळ धोरणांमुळे, योजनांमुळे, किंवा यंत्रणेमध्ये परिवर्तन घडविल्यानेही होत नाही तर, आम्ही आज जे काही आहोत ते सारेच्या सारे त्यागरूपी अग्निमध्ये भस्मसात करून, एक नवीन हृदय प्राप्त करून घेण्यामधून आणि ‘माते’च्या कुशीतून पुन्हा जन्माला येण्यातून होतो. स्व-परित्यागाची आमच्याकडून मागणी केली जात आहे. माता आम्हाला विचारत आहे, “तुमच्यापैकी किती जणं माझ्यासाठी जगायला तयार आहात? तुमच्यापैकी किती जणं माझ्यासाठी प्राणार्पण करायला तयार आहात?” आणि ती आमच्या उत्तराची वाट पाहात आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 06-07 : 1032-1033)

Latest posts by श्रीअरविंद (see all)
श्रीअरविंद

श्री अरविंद यांची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व बंगाली भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

मुलांचे संगोपन

(श्रीमाताजी येथे शिक्षकांना मार्गदर्शन करत आहेत. परंतु व्यापक अर्थाने ते पालकांनाही उपयुक्त ठरू शकेल असे…

15 hours ago

विजयाची खात्री

जीवनऋतू - १७ (मुलांचे संगोपन कसे केले पाहिजे हे श्रीमाताजींनी सांगितले आहे आणि ते आपण…

2 days ago

सकारात्मक वृत्तीचा परिणाम

  (लहान मुलांच्या स्वप्नवत कल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी पालकांनी त्यांना प्रोत्साहन द्यावे, हे श्रीमाताजींनी सांगितले आहे.…

3 days ago

स्वप्नांवर विश्वास ठेवा

उत्तम स्थितीत जन्माला आलेल्या मुलाच्या म्हणजे ज्याच्या अंतरंगामध्ये एक सचेत चैत्य पुरुष (psychic being) असतो…

4 days ago

उपयुक्ततावादाचा आजार

साधारणपणे शंभर वर्षे किंवा त्याहूनही अधिक काळ समस्त मानवजात एका आजाराने ग्रासली आहे आणि तो…

5 days ago

शिक्षण आणि संस्कृती

व्यक्तीने कायम बौद्धिकरित्या नव्हे तर, मानसशास्त्रीय दृष्टीने देखील शिक्षण घेतले पाहिजे. व्यक्तीने आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या दृष्टीने…

6 days ago