पूर्णयोग आणि बौद्धमत – ०२
दया आणि करुणा या दोन भिन्न प्रकारच्या भावना आहेत. माणसांच्या वाट्याला जे दुःखभोग आलेले असतात ते दूर करण्यासाठीची तीव्र उर्मी म्हणजे ‘करुणा’. दुसऱ्याचे दुःख पाहून वा इतरांच्या दुःखाबद्दलच्या विचाराने असहाय्य दुर्बलतेची भावना निर्माण होणे म्हणजे ‘दया’.
करुणा हा बलवंतांचा मार्ग आहे, भगवान बुद्धांच्या कुटुंबीयांना, मित्रमंडळींना, आप्तांना विरहदुःख सहन करावे लागले; त्यांचे जणू सर्वस्व गमावले गेले होते पण करुणार्द्र होऊन, या जगातील दुःखांचा निरास करण्यासाठी भगवान बुद्ध घराबाहेर पडले…
पूर्णमानव, सिद्ध किंवा बुद्ध हा विश्वव्यापी होतो, सहानुभूतीने व एकतेने सर्व अस्तित्वाला कवटाळतो, स्वत:मध्ये वसणाऱ्या ‘स्व’चा स्वत:मधल्याप्रमाणेच इतरांमध्येही शोध घेतो. आणि असे करून, तो विश्वशक्तीच्या अनंत सामर्थ्याला कमीअधिक प्रमाणात स्वत:च्या ठिकाणी आणतो, हे भारतीय संस्कृतीचे विधायक ध्येय आहे.
– श्रीअरविंद
(CWSA 09 : 153-154) (CWSA 20 : 254)
अभीप्सा ही बहुधा नेहमीच चैत्य पुरुषाची (psychic being) अभिव्यक्ती असते. चैत्य पुरुष म्हणजे आपल्यातील असा…
ईश्वराविषयीची अभीप्सा हीच पहिली आवश्यक गोष्ट आहे. ती असेल तर पुढची आवश्यक गोष्ट म्हणजे, या…
जर इच्छावासनांना नकार दिला गेला व त्यांनी व्यक्तीच्या विचार, भावभावना, कृती यांच्यावर वर्चस्व गाजवणे बंद…
आपण प्रथम कोणती गोष्ट केली पाहिजे? तर ती म्हणजे, आपण स्वत:चे अस्तित्व घडवले पाहिजे…
(उत्तरार्ध...) बाह्य रूपाकारालाच जखडून राहणे आणि शरीर म्हणजेच ‘मी’ आहे असे समजणे ही व्यक्तीची…
तुम्हाला जर आत्म्याचा शोध घ्यायचा असेल तर तुम्हाला तुमच्या अंतरंगात खोलवर उतरले पाहिजे. तुम्ही पृष्ठवर्ती…