आपण इथे आहोत ते सर्व इच्छा-वासनांना टाकून देत भगवंताकडे वळण्यासाठी आणि ईश्वराविषयी जागरूक होण्यासाठी! ज्या ईश्वराच्या प्राप्तीची आपण इच्छा करतो तो कोणी दूरस्थ आणि अप्राप्य नाही. तो आपल्या स्वत:च्या सृष्ट विश्वाच्या अंतस्थ गाभ्यात विद्यमान आहे आणि आपल्याकडून ज्या कृतीची त्याला अपेक्षा आहे ती कृती म्हणजे ‘त्या’चा शोध. तसेच आपल्या व्यक्तिगत रूपांतरणाच्या साह्याने ‘त्याला’ जाणण्यास, ‘त्याच्या’शी एकत्व पावण्यास, आणि अखेरीस जाणीवपूर्वक ‘त्याला’ अभिव्यक्त करण्यास समर्थ बनणे ही होय. ह्याच गोष्टीसाठी आपण स्वत:ला समर्पित केले पाहिजे, हेच आपल्या अस्तित्वाचे खरे प्रयोजन आहे. आणि या श्रेष्ठ साक्षात्काराच्या दिशेने पडणारे आपले पहिले पाऊल म्हणजे अतिमानसिक चैतन्याचे आविष्करण.
– श्रीमाताजी
(CWM 13 : 347)
“ज्याच्याकडे स्वतःच्या मालकीचे काहीच नसते तो आनंदी असतो,” असे म्हटले जाते तेव्हा त्याचा अर्थ असा…
(उत्तरार्ध) आंतरिक ‘सूर्य’ शोधण्यासाठी तुम्ही अंतरंगामध्ये पुरेसे खोलवर गेले पाहिजे, त्या सूर्याच्या तेजोप्रवाहामध्ये स्वतःला प्रवाहित…
पृथ्वीवरील जीवन परिपूर्ण करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे या जीवनाकडे इतक्या उंचीवरून पाहायचे की, जेथून व्यक्तीला…
हृदयापासून असलेली अभीप्सा आणि (परमेश्वराचा) अंत:करणपूर्वक केलेला साधा, सरळ, प्रामाणिक धावा ही एक अतिशय महत्त्वाची…
तुमचे वैयक्तिक मोल कितीही असू दे किंवा तुम्हाला व्यक्तिगतरित्या कोणताही साक्षात्कार झालेला असू दे, पहिला…
आपल्या 'मी'ला अस्तित्व नसून, केवळ परम चेतना, परम संकल्पशक्ती हीच अस्तित्वात आहे, हे जाणणे यामध्ये…