आपण इथे आहोत ते सर्व इच्छा-वासनांना टाकून देत भगवंताकडे वळण्यासाठी आणि ईश्वराविषयी जागरूक होण्यासाठी! ज्या ईश्वराच्या प्राप्तीची आपण इच्छा करतो तो कोणी दूरस्थ आणि अप्राप्य नाही. तो आपल्या स्वत:च्या सृष्ट विश्वाच्या अंतस्थ गाभ्यात विद्यमान आहे आणि आपल्याकडून ज्या कृतीची त्याला अपेक्षा आहे ती कृती म्हणजे ‘त्या’चा शोध. तसेच आपल्या व्यक्तिगत रूपांतरणाच्या साह्याने ‘त्याला’ जाणण्यास, ‘त्याच्या’शी एकत्व पावण्यास, आणि अखेरीस जाणीवपूर्वक ‘त्याला’ अभिव्यक्त करण्यास समर्थ बनणे ही होय. ह्याच गोष्टीसाठी आपण स्वत:ला समर्पित केले पाहिजे, हेच आपल्या अस्तित्वाचे खरे प्रयोजन आहे. आणि या श्रेष्ठ साक्षात्काराच्या दिशेने पडणारे आपले पहिले पाऊल म्हणजे अतिमानसिक चैतन्याचे आविष्करण.
– श्रीमाताजी
(CWM 13 : 347)
अधीरता नेहमीच चुकीची असते. ती साधनेला साहाय्य करत नाही तर, ती अडथळे निर्माण करते. अविचल,…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४४ (श्रीअरविंद लिखित पत्रामधून...) कोणतीही अडचण आली किंवा कितीही त्रास सहन करावा…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४३ (श्रीअरविंद लिखित पत्रामधून...) साधनेमध्ये सुरुवातीच्या टप्प्यावर नेहमीच अडचणी येतात आणि त्यामुळे…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४२ (श्रीअरविंद लिखित पत्रामधून...) नामस्मरणाच्या शक्तीचा आणि संरक्षणाचा तुम्हाला अनुभव आला आहे…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४१ (मला फक्त ईश्वर दर्शनाचीच आस आहे, पण तरीही तो मला दर्शन…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४० (उत्तरार्ध) एखादी अशी गोष्ट की, जी अद्यापि आविष्कृत किंवा साध्य झालेली…