ऑरोविल ही एक अशी वैश्विक नगरी बनू इच्छिते की, जेथे पंथातीत होऊन, सर्व राष्ट्रीयता व सर्व प्रकारच्या राजकारणाच्या अतीत होऊन, सर्व देशांमधील स्त्रीपुरुष, शांती व प्रगतशील सुसंवादाने जीवन व्यतीत करू शकतील. मानवी एकता प्रत्यक्षात उतरविणे हा ऑरोविलचा हेतू आहे.
*
पृथ्वीला अशा एका स्थानाची आवश्यकता आहे की, जिथे माणसे राष्ट्राराष्ट्रांमधील वैमनस्य, सामाजिक रूढी, स्व-विसंगत नैतिकता आणि परस्परांमध्ये झगडणारे धर्म यांच्यापासून दूर राहून जगू शकतील; एक असे स्थान की, जिथे मानव, भूतकाळच्या गुलामगिरीतून मुक्त होऊन, अभिव्यक्त होऊ पाहणाऱ्या दैवी चेतनेच्या शोधामध्ये, त्याच्या सरावामध्ये स्वत:ला पूर्णत: वाहून घेऊ शकेल. असे स्थान बनण्याची ऑरोविलची इच्छा आहे आणि उद्याचे ‘सत्य’ जगणे, ही ज्यांची अभीप्सा आहे त्या सर्वांना, ऑरोविलने स्वत:स अर्पित केले आहे.
*
(ऑरोविल) अंतिमत: एक असे स्थान असेल की, जेथे एखादी व्यक्ती केवळ प्रगतीचा आणि स्वत:च्या अतीत जाण्याचा विचार करीत असेल.
अंतिमत: असे एक स्थान की, जेथे एखादी व्यक्ती राष्ट्र, धर्म व आकांक्षांच्या संघर्षांविना किंवा शत्रुत्वाविना शांतीने जगू शकेल.
अंतिमत: असे एक स्थान की, जेथे कोणत्याच गोष्टीला एकमेवाद्वितीय सत्य म्हणून स्वत:ला इतरांवर थोपविण्याचा अधिकार नसेल.
– श्रीमाताजी
(CWM 13 : 188), (CWM 13 : 202), (CWM 13 : 195-196)
(एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) ईश्वरी कृपेबद्दल कोणतीच शंका असू शकत नाही. मनुष्य जर प्रामाणिक…
अध्यात्म-साधनेसाठी प्रामाणिकपणा अगदी अत्यावश्यक असतो आणि कुटिलता ही कायमस्वरूपी अडथळा असते. सात्त्विक प्रवृत्ती ही…
(एका साधकाची अशी समजूत झाली आहे की, त्याच्यामध्ये असलेल्या अपूर्णतांमुळे तो योगमार्गासाठी अपात्र आहे.…
पूर्णयोगाच्या मार्गावरून वाटचाल करण्यासाठी तुमच्यामध्ये निर्भय शौर्य असणे आवश्यक आहे. तुम्ही भीतीच्या क्षुल्लक, दुर्बल…
तुमची इच्छा नसतानासुद्धा तुमच्यामध्ये जेव्हा एखादा आवेग निर्माण होतो तेव्हा लगेचच एक गोष्ट तुम्ही…
तुम्ही समर्पणाचा मार्ग पूर्णतया आणि प्रामाणिकपणे स्वीकारलात तर मग कोणताही धोका किंवा कोणतीही गंभीर…