अजूनही काही प्रकारचे असमतोल असतात. (आता मी जे योगसाधना करतात किंवा आध्यात्मिक जीवन म्हणजे काय आहे हे ज्यांना माहीत असते आणि त्यानुसार, त्या मार्गावर वाटचाल करण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्याविषयी बोलत आहे.) तुमच्या अंतरंगातील एखाद्या भागाला, मग तो मानसिक असेल, प्राणिक असेल किंवा शारीरिक सुद्धा असू शकेल, त्याला नीटसे काहीतरी उमगलेले असते, त्याच्यामध्ये बऱ्यापैकी अभीप्सा असते, विशिष्ट दृष्टिकोन असतात. आणि तो भाग चांगल्या रीतीने शक्तिग्रहण करत असतो आणि चांगली प्रगती करत असतो. आणि असे काही भाग असतात की, जे अशी प्रगती करू शकत नाहीत, आणखीही असे काही भाग असतात की, ज्यांना हे काही नकोच असते (अर्थात हे खूपच वाईट आहे.) पण असेही काही भाग असतात, की ज्यांना इच्छा असते पण ते काही करू शकत नसतात, त्यांच्याकडे तशी क्षमता नसते, ते तयार नसतात.
म्हणजे, तुमच्यामध्ये असे काही असते की, जे ऊर्ध्वमुखी उन्नत होत असते आणि काही असेही असते की, जे जागचे हालत नाही. आणि तेच प्रचंड असमतोल निर्माण करण्यास कारणीभूत ठरते. आणि त्याचे प्रतिबिंब कोणत्या ना कोणत्या आजारमध्ये पडते, कारण तुम्ही आंतरिकरित्या इतक्या तणावपूर्ण अवस्थेत असता – कोणीतरी अक्षम असते किंवा कोणीतरी अडून राहते, ते अजिबात हालचाल करत नाही आणि एखाद्या कोणालातरी मात्र वाटचाल करावयाची असते. आणि यातूनच एक अत्यंत भीतीदायक अस्वस्थता येते आणि त्याचा परिणाम हा बहुधा आजारपणात होतो.
(क्रमश:)
– श्रीमाताजी
(CWM 05 : 171-181)
(एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) ईश्वरी कृपेबद्दल कोणतीच शंका असू शकत नाही. मनुष्य जर प्रामाणिक…
अध्यात्म-साधनेसाठी प्रामाणिकपणा अगदी अत्यावश्यक असतो आणि कुटिलता ही कायमस्वरूपी अडथळा असते. सात्त्विक प्रवृत्ती ही…
(एका साधकाची अशी समजूत झाली आहे की, त्याच्यामध्ये असलेल्या अपूर्णतांमुळे तो योगमार्गासाठी अपात्र आहे.…
पूर्णयोगाच्या मार्गावरून वाटचाल करण्यासाठी तुमच्यामध्ये निर्भय शौर्य असणे आवश्यक आहे. तुम्ही भीतीच्या क्षुल्लक, दुर्बल…
तुमची इच्छा नसतानासुद्धा तुमच्यामध्ये जेव्हा एखादा आवेग निर्माण होतो तेव्हा लगेचच एक गोष्ट तुम्ही…
तुम्ही समर्पणाचा मार्ग पूर्णतया आणि प्रामाणिकपणे स्वीकारलात तर मग कोणताही धोका किंवा कोणतीही गंभीर…