जेव्हा चैत्य पुरुष पुढे येतो तेव्हा, व्यक्तीला, साध्यासुध्या उत्स्फूर्त अशा आत्मदानासहित चैत्य पुरुषाची जाणीव होते आणि मन, प्राण व शरीर यांच्यावरील त्याच्या चढत्या-वाढत्या थेट नियंत्रणाचा व्यक्तीला अनुभव येतो; हे नियंत्रण निव्वळ झाकलेल्या किंवा अर्ध-झाकलेल्या प्रभावातून आलेले नसते, तर ते थेट नियंत्रण असते.
विशेषत: जेव्हा चैत्य विवेक येतो तेव्हा विचार, भावनिक आंदोलनं, प्राणिक आवेग, शारीरिक सवयी एकाएकी उजळून निघतात आणि तेथे काहीच धूम्राच्छादित, झाकोळलेले, तिमिरात्मक असे शिल्लक रहात नाही; चुकीच्या हिंदोळ्यांऐवजी योग्य स्पंदने त्यांची जागा घेतात. हा चैत्य विवेक दुर्लभ आणि दुर्मिळ असतो.
*
केंद्रवर्ती प्रेम, भक्ती, समर्पण, सर्वस्वदान, आध्यात्मिक दृष्ट्या योग्य काय व अयोग्य काय हे नेहमीच स्वच्छपणे पाहणारी आणि आपोआपच अयोग्य गोष्टींना नकार देणारी आंतरिक दृष्टी ही चैत्य पुरुष पुढे आल्याची लक्षणं आहेत.
तसेच, समग्र आत्मनिवेदनाची प्रक्रिया आणि एखाद्या व्यक्तीने स्वत:मधील सर्वाचे श्रीमाताजींच्या प्रति केलेले समर्पण ही देखील चैत्य पुरुष पुढे आल्याची लक्षणं आहेत.
– श्रीअरविंद
(CWSA 30 : 352), (CWSA 30 : 356)
(माणसाचे जीवन चिंताग्रस्त का आहे आणि त्यावर उपाय काय, हे श्रीमाताजी येथे खुलासेवार स्पष्ट…
मनुष्य हा पृथ्वीतलावरचा अंतिम टप्पा आहे, अशी बहुधा सर्वांची समजूत असते. परंतु ‘मन हा…
नमस्कार वाचकहो, अभीप्सा मासिक, ऑरोमराठी वेबसाईट आणि ज्योतिर्मयी मिडिया हाऊस या उपक्रमांतर्गत आपण श्रीअरविंद आणि…
असे नावीन्यपूर्ण काय आहे की, जे आपण अद्यापि साध्य केलेले नाही? आपल्याला ‘प्रेम’ संपादन…
आत्तापर्यंत मनुष्याने जे संपादन केले आहे त्याचीच पुनरावृत्ती करणे हे आपले काम नाही तर, नवीन…
स्वतःच्या अक्षाभोवती फिरत राहणे हीच मानवी आत्म्याची एकमेव गती नाही. अक्षय प्रकाशमान असणाऱ्या सूर्याभोवती…