Tag Archive for: अवतरणाचा दाब

 

(अगदी बारीकसारीक आध्यात्मिक अनुभवामुळे हुरळून जाणाऱ्या नवोदित साधकांना श्रीमाताजी सांगत आहेत…)

तुम्हाला ईश्वरी अवतरणाचा दाब (pressure) पेलायचा असेल तर तुम्ही खूप सुदृढ, शक्तिशाली असले पाहिजे, नाहीतर तुम्ही विखरून जाल. काही लोकांनी मला असे विचारले, “ईश्वर अजून अवतरित का होत नाही?” तर त्याचे कारण, “अजून तुम्ही (त्याच्या अवतरणासाठी) तयार नाही,” हे आहे. ईश्वराच्या अवतरणाचा एखादा अल्पांश जर तुम्हाला गायला, नाचायला आणि आनंदातिशयाने आरडाओरड करायला लावत असेल तर, तो पूर्णत: अवतरला तर काय होईल?

म्हणूनच आम्ही सांगत असतो की, ज्या लोकांकडे शरीर, प्राण आणि मन यांच्यामध्ये एक भक्कम, सुस्थिर आणि विशाल पाया नसेल त्यांनी ईश्वरी शक्ती खेचू नये. याचे कारण अशा व्यक्ती ते अवतरण पेलू शकणार नाहीत. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, ”ईश्वरी शक्ती खाली ओढण्याचा प्रयत्न करू नका त्याऐवजी, शांती आणि स्थिरता धारण करून त्या शक्तीच्या अवतरणाची प्रतीक्षा करा.”

परंतु ज्यांच्याकडे आवश्यक असा पाया आहे, अधिष्ठान आहे त्यांना आम्ही सांगतो की, ”अभीप्सा बाळगा आणि ईश्वरी शक्ती शक्य तितकी अधिकाधिक मिळविण्याचा प्रयत्न करा.” कारण अशा व्यक्तीच विचलित न होता, ईश्वराकडून अवतरित होणाऱ्या शक्ती ग्रहण करू शकतील.

– श्रीमाताजी (CWM 03 : 11)