चार उदात्त तत्त्वं
पूर्णयोग आणि बौद्धमत – २१
धम्मपद : भयभीत होऊन माणसं पर्वतराजींमध्ये, अरण्यामध्ये, वनराजींमध्ये, मठमंदिरांमध्ये, ठिकठिकाणी आश्रय घेतात.
पण हा सुरक्षित आश्रय नाही, हा सर्वोच्च आश्रय नाही. ह्या आश्रयस्थानी येऊनही माणसाचा दु:खभोगापासून बचाव होऊ शकत नाही.
जो बुद्धाचा, धम्माचा आणि संघाचा पूर्णज्ञानानिशी आश्रय घेतो, त्याला चार उदात्त तत्त्वांचा बोध होतो –
१) दुःखभोग २) दुःखभोगाचे मूळ ३) दु:खभोगाची समाप्ती आणि ४) या समाप्तीकडे घेऊन जाणारा अष्टपदी मार्ग
वास्तविक, हे खरे खात्रीचे आश्रयस्थान आहे, हे सर्वोच्च आश्रयस्थान आहे. ह्या आश्रयाची निवड करणे म्हणजे सर्व दुःखभोगापासून मुक्त होणे.
श्रीमाताजी : दु:खभोगाची समाप्ती ज्यामधून घडून येईल त्या चार तत्त्वांशी आणि अष्टपदी मार्गाशी हे वचन संबंधित आहे.
चार उदात्त तत्त्वे पुढीलप्रमाणे :
१) ज्या सामान्य अर्थाने जीवन या शब्दाचा अर्थ घेतला जातो ते जीवन अज्ञानाचे आणि मिथ्यत्वाचे जीवन आहे. ते देहाच्या व मनाच्या दुःखभोगाशी अतूटपणे जोडले गेलेले आहे.
२) वासना हे दुःखभोगाचे मूळ आहे, विभक्त जीवनाच्या स्वरूपाबद्दलचे अज्ञान हे वासनांचे मूळ आहे.
३) दुःखभोगापासून सुटका करून घेण्याचा, वेदनांचा अंत करण्याचा एक मार्ग आहे.
४) अष्टपदी मार्गाच्या आचरणाने हळूहळू मनाची अज्ञानापासून शुद्धी होत जाते आणि त्यातून ही मुक्ती प्राप्त होते. ह्या चौथ्या सत्याला अष्टपदी मार्गाची पद्धत असे संबोधले जाते.
(अष्टपदी मार्ग उद्याच्या भागात…)
– श्रीमाताजी
(CWM 03 : 248)
(सौजन्य : @AbhipsaMarathiMasik – अभीप्सा मराठी मासिक)
- स्वत:ला न फसविणे अवघड - March 16, 2026
- प्रामाणिकपणा आणि स्व-समर्थन - March 15, 2026
- द्वंद्वात्मकता आणि संपूर्ण प्रामाणिकपणा – भाग ०४ - March 14, 2026





