प्रामाणिकपणा आणि ईश्वरी साहाय्य

ईश्वरी साहाय्य मिळण्यासाठी प्रामाणिकपणाचा एक कणदेखील पुरेसा असतो. व्यक्तीला एखाद्या समस्येवर खरोखरच उत्तर हवे असेल अशा वेळी, तिने जर अगदी प्रामाणिकपणे ईश्वराला आवाहन केले आणि त्याच्या प्रतिसादाची प्रतीक्षा केली तर, व्यक्तीला त्याच्याकडून नेहमीच प्रतिसाद मिळतो. मात्र एकीकडे आवाहन करायचे आणि त्याच वेळी दुसरीकडे, “आता मी ईश्वराला आवाहन तर केले आहे, पण तो प्रतिसाद देतोय का पाहू या,” असे म्हणायचे, (बरेच जणं असं करतात.) पण अर्थातच ही गोष्ट काही योग्य नाही. व्यक्ती जर मन निश्चल-निरव करू शकली आणि ती थोडी जरी शांत झाली तर, ईश्वरी साहाय्य मिळत आहे हे तिला संवेदित होते. एवढेच नव्हे तर, ते साहाय्य कोणत्या रूपात मिळणार आहे तेही तिला संवेदित होते.

*

ढोंग आणि नाटकीपणाचा महासागर असण्यापेक्षा, प्रामाणिकपणाचा एक थेंब हा शाश्वत चेतनेच्या दृष्टीने कितीतरी अधिक मौल्यवान असतो.

– श्रीमाताजी (CWM 05 : 370-371) & (CWM 12 : 129)

श्रीमाताजी