विचार शलाका – ०४
विचार शलाका – ०४
धैर्यवान बना आणि स्वत:विषयी फार विचार करत बसू नका. तुम्ही तुमच्या क्षुद्र अहंकाराला सर्व जीवनव्यवहाराचे केंद्र बनविता आणि त्यामुळे तुम्ही असमाधानी व खिन्न होता. स्वत:ला विसरणे हाच सर्व व्याधींवरील रामबाण उपाय आहे.
*
धीर धरा ! प्रतिदिनी प्रात:काळी आपल्या पहिल्या किरणांच्याद्वारे उगवता सूर्य जी शिकवण, जो संदेश पृथ्वीला देतो तो ऐका. तो आशेचा किरण असतो; तो दिलासादायक संदेश असतो. अशी कोणतीच रात्र नाही की जिच्या अंती उषेचा उदय होत नाही; अंधकार जेव्हा अति घनदाट होतो त्याचवेळी उषेचे आगमन होण्याची तयारी झालेली असते….
– श्रीमाताजी [CWM 16 : 175], [CWM 02 : 44]
Latest posts by श्रीमाताजी (see all)
- पूर्णयोगाच्या मार्गावरून वाटचाल करण्यासाठी… - April 27, 2026
- योगमार्गाचे अनुसरण करण्याचा निर्णय - April 26, 2026
- योगमार्गावरून सुरक्षित वाटचाल - April 25, 2026






