ईश-स्मरण आणि कर्म
कर्म आराधना – १९
केवळ एक सर्वसाधारण दृष्टिकोन असून चालणार नाही तर, प्रत्येक कर्मच ‘दिव्य माते’ला अर्पण केले पाहिजे म्हणजे मग तो दृष्टिकोन सदासर्वदा जिवंत राहील.
काम करत असताना त्या वेळामध्ये ध्यान करता कामा नये, कारण त्यामुळे कामामधून लक्ष निघून जाईल, परंतु ज्याच्याप्रत तुम्ही ते कर्म अर्पण करणार आहात त्या ‘एकमेवाद्वितीय’ ईश्वराचे स्मरण मात्र तुमच्यामध्ये कायम असले पाहिजे.
ही केवळ एक पहिली प्रक्रिया आहे; कारण, पृष्ठवर्ती मन (surface mind) जेव्हा कर्म करत असते तेव्हा, ‘ईश्वरी उपस्थिती’च्या संवेदनेवर तुमच्या अंतरंगातील शांत अस्तित्व एकाग्र असल्याची सातत्यपूर्ण जाणीव जर तुम्हाला असेल, किंवा दिव्य ‘माते’ची शक्तीच कार्य करत आहे आणि तुम्ही केवळ एक माध्यम आहात किंवा एक साधन आहात अशी जाणीव जर तुम्हाला नेहमीच होऊ लागली तर मग, ईश-स्मरणाच्या जागी, ‘योग’साक्षात्कार आपोआपच नित्य घडू लागेल, कर्मामध्ये दिव्य ऐक्य होण्यास सुरुवात होईल.
– श्रीअरविंद
(CWSA 32 : 247)
- पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४५ - December 13, 2025
- पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४४ - December 12, 2025
- पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४३ - December 11, 2025






