निसर्गाचे रहस्य – १०
ज्यांना स्वतःचे शुद्धीकरण करून घेण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी पाऊस असतो. तो तुमच्यातील सारे दोष, साऱ्या त्रुटी आणि साऱ्या अशुद्धता दूर करतो. पावसामध्ये पृथ्वीचे, पृथ्वीवर जीवन जगणाऱ्या माणसांचे आणि पृथ्वीवरील वातावरणाचे शुद्धीकरण करण्याची शक्ती असते.
परंतु त्यासाठी व्यक्तीने स्वतःला खुले ठेवले पाहिजे, तिच्या मनात किंचितही भीती असता उपयोगी नाही; ताप येईल किंवा आपण आजारी पडू अशी कोणतीही भीती असता कामा नये. आपल्या वर असणाऱ्या त्या ‘विशालते’प्रत आपण स्वतःला खुले ठेवले आणि पावसाला आपले शुद्धीकरण करू दिले, तर त्याचे ठोस परिणाम दिसून येतात.
– श्रीमाताजी
(Throb of Nature : 197)
Latest posts by श्रीमाताजी (see all)
- शिक्षक होणे ही एक सर्वोत्तम साधना - June 15, 2026
- मुलांचे संगोपन - June 14, 2026
- विजयाची खात्री - June 13, 2026





