तथाकथित ‘व्यावहारिक’ साधने

विचार शलाका – १८

मानवता आज ज्या भयानक गर्तेत बुडाली आहे, त्यापासून तिला वाचविण्यासाठी चेतनेचे आमूलाग्र परिवर्तन होणेच आवश्यक आहे, दुसरे काहीही तिला त्यापासून वाचवू शकणार नाही.

सर्व तथाकथित ‘व्यावहारिक’ साधने म्हणून जी सांगितली जातात ती साधने म्हणजे माणसांनी डोळ्यांवर पट्टी बांधून स्वत:लाच आंधळे बनविण्यासारखा बालीशपणा आहे, की ज्यामुळे ते खऱ्या आवश्यकतेकडे व रामबाण उपायाकडे दुर्लक्ष करतात.

– श्रीमाताजी
(CWM 15 : 61)

श्रीमाताजी