Entries by श्रीमाताजी

मानवजातीसाठी सर्वोत्तम संधी

…..जगातील कोणत्याही समूहांच्या तुलनेत, ऑरोविलसारख्या एखाद्या नगरीची निर्मिती ही पृथ्वीच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वपूर्ण घटना आहे असे जेव्हा मी लोकांना सांगते, तेव्हा ते माझ्यावर विश्वास ठेवत नाहीत. त्यांच्यादृष्टीने ती अगदी नगण्य अशी भाकडकथा आहे. मी एकदा श्रीअरविंदांना विचारले, (कारण तेव्हा ऑरोविल ही माझी एक ‘संकल्पना’ होती, संकल्पना नव्हे, तर ती एक गरज होती, जी तीसवर्षांपेक्षा अधिक […]

सुमेळाची सुरुवात

सर्व राष्ट्रांनी एकत्रित येऊन सहकार्याने काही निर्मिती करावी याविषयी मी बोलत आहे… सत्याच्या पायावर उभारल्या जाणाऱ्या निर्मितीतील राष्ट्रांच्या परस्परसहकार्याविषयी मी बोलत आहे…. सत्याच्या पायावर उभारल्या जाणाऱ्या एका निर्मितीबद्दल सर्वांमध्ये असलेल्या एकत्रित आस्थेविषयी मी बोलत आहे. असत्यावर आधारित संहारक असे सामर्थ्य मिळविण्यासाठी त्यांनी आजवर संयुक्तपणे स्वारस्य दाखविले आहे. (अर्थातच, परस्परांमध्ये कोणतेही साधर्म्य नसताना सुद्धा.) ऑरोविल म्हणजे […]

ऑरोविलच्या निर्मितीचा परिणाम

जर सर्व देशांमध्ये ऑरोविलच्या निर्मितीविषयी स्वारस्य जागृत होऊ शकले तर, त्यांनी आजवर जी चूक केली आहे, त्याचे परिमार्जन करण्याची ताकद त्यांच्यामध्ये हळू हळू येऊ लागेल. आणि स्वाभाविकपणेच, जेव्हा मला हे दाखविण्यात आले तेव्हा माझ्या लक्षात आले. ऑरोविलच्या निर्मितीचा परिणाम अदृश्यामध्ये काय व कसा झाला आहे, हे मला उमगले. ही कृती भौतिकातील, बाह्यवर्ती अशी नव्हती. ती […]

संभाव्य अरिष्ट व त्यावरील गूढ उपाय

पृथ्वीवर आज जी खरोखर दुःखदायक आणि भयंकर परिस्थिती आली आहे त्या तिच्या परिस्थितीकडे, तसेच सर्व देश ज्या दयनीय स्थितीतून जात आहेत त्या त्यांच्या अवस्थेकडे मी काही कारणासाठी पाहत होते. तेव्हा सर्वांना कवेत घेईल असे एक दृश्य माझ्या अंत:दृष्टीला दिसले; विविध देश आजवर जसे वागले आहेत आणि अधिकाधिक प्रमाणात, ज्या चढत्यावाढत्या खोटेपणाने वागत आहेत ते सारे […]

एक विशाल स्वप्न

न संपणाऱ्या युद्धांचा दीर्घ इतिहास असतानासुद्धा मानवजातीने आजवर खोल अंतरंगात एका आनंदमय, शांतीपूर्ण आणि सुसंवादी अशा सामूहिक जीवनाची अभीप्सा जोपासलेली आहे. मानवाच्या धार्मिक आणि धर्मनिरपेक्ष विचारांमध्ये या अभीप्सेने वेगवेगळी रूपे धारण केली आहेत. पण आजवर आपण फक्त तिच्या जवळपास जाईल अशी तात्पुरती एकता संपादन करण्यात यशस्वी झालो आहोत, खरी एकता मिळविण्यात नाही. कदाचित खराखुरा पायाच […]

पहिला प्रयोग

एखाद्याकडे संपूर्ण पारदर्शी प्रामाणिकता हवी. प्रामाणिकपणाचा अभाव हेच आज आपणाला भेडसावत असणाऱ्या सर्व अडचणींचे मूळ आहे. सर्व माणसांमध्ये अप्रामाणिकपणा आहे. या पृथ्वीवर केवळ शंभर माणसं अशी असतील की, जी संपूर्णपणे प्रामाणिक आहेत. माणसाची मूळ प्रकृतीच त्याला अप्रामाणिक बनविते – ती खूप जटिल आहे, कारण तो सातत्याने स्वत:ला फसवत असतो, स्वत:पासून सत्य लपवत असतो, स्वत:साठी सबबी […]

ऑरोविलचे प्रतीक

केंद्रस्थानी असलेला बिंदू ऐक्याचे प्रतीक आहे, परमश्रेष्ठाचे प्रतीक आहे; आतील वर्तुळ हे निर्मितीचे, नगरीच्या संकल्पनेचे प्रतिनिधित्व करते; बाहेरील पाकळ्या त्या संकल्पनेच्या अभिव्यक्तीचे, मूर्तरूपाचे सामर्थ्य दर्शवितात. * शुभ संकल्प बाळगणाऱ्या सर्वांना ‘ऑरोविल’तर्फे शुभेच्छा ! ज्यांना प्रगतीची आस आहे आणि जे उच्चतर व अधिक सत्यमय जीवनाची अभीप्सा बाळगतात त्या सर्वांना ऑरोविल निमंत्रित करीत आहे. – श्री माताजी […]

एक महान स्वप्न

या भूतलावर असे एक स्थान असावे की, जेथे कोणतेच राष्ट्र मालकी हक्काचा दावा करणार नाही. जिथे प्रामाणिक अभीप्सा बाळगणारी, शुभसंकल्प असणारी सर्व माणसं, या विश्वाचे नागरिक म्हणून मुक्त मनाने जीवन जगू शकतील. ती केवळ एकाचीच, म्हणजेच त्या परम सत्याचीच आज्ञा पाळतील. शांती, सलोखा, सुमेळ यांनी युक्त असे हे स्थान असेल जेथे, माणसांमधील संघर्षभावनेच्या सर्व प्रेरणा […]

वैश्विक नगरी

ऑरोविल ही एक अशी वैश्विक नगरी बनू इच्छिते की, जेथे पंथातीत होऊन, सर्व राष्ट्रीयता व सर्व प्रकारच्या राजकारणाच्या अतीत होऊन, सर्व देशांमधील स्त्रीपुरुष, शांती व प्रगतशील सुसंवादाने जीवन व्यतीत करू शकतील. मानवी एकता प्रत्यक्षात उतरविणे हा ऑरोविलचा हेतू आहे. * पृथ्वीला अशा एका स्थानाची आवश्यकता आहे की, जिथे माणसे राष्ट्राराष्ट्रांमधील वैमनस्य, सामाजिक रूढी, स्व-विसंगत नैतिकता […]

पृथ्वीवरच प्रगती शक्य आहे.

शरीरातील चैत्य अस्तित्वाची उपस्थिती हे नेहमीच सुरचना आणि परिवर्तनाचे केंद्र असते. म्हणून, दोन शारीर जन्मांच्या मधल्या संक्रमणाच्या काळात प्रगती होत राहते, असे समजणे किंवा काही जण मानतात त्याप्रमाणे, त्या काळात ही प्रगती अधिक पूर्णत्वाने आणि अधिक त्वरेने होते, असे मानणे ही मोठी चूक आहे. सर्वसाधारणत: त्या काळात कोणतीही प्रगती होत नाही; कारण चैत्य पुरुषाने विश्रांत […]