योग आणि मानवी नातेसंबंध – १६
(श्रीअरविंद एका साधकाला पत्राद्वारे लिहीत आहेत…) …नातेसंबंध कधीच पूर्ण किंवा स्थायी समाधान देऊ शकत नाहीत; तसे असते तर मनुष्याला ईश्वरप्राप्तीसाठी धडपडण्याचे कारणच नव्हते. तो त्याच्या सर्वसामान्य ऐहिक जीवनामध्येच समाधानी राहिला असता. जेव्हा ईश्वर गवसतो आणि चेतना ही सत्य-चेतनेमध्ये उन्नत होते, तेव्हाच इतरांबरोबर खरी नाती निर्माण होऊ शकतात. – श्रीअरविंद (CWSA 31 : 283)





