Entries by श्रीअरविंद

रामायण – राष्ट्रीय चारित्र्याची घडण (भाग ०२)

भारत – एक दर्शन २४ महाभारताप्रमाणेच रामायणाच्या कवीनेसुद्धा त्याचा काव्यविषय म्हणून एक इतिहास, प्राचीन भारतीय वंशाशी संबंधित अशी एक प्राचीन कथा किंवा आख्यान हाती घेतले होते आणि त्याने त्यामध्ये आख्यायिकांमधील आणि लोकसाहित्यामधील तपशिलांची भर घातली. एवढेच नव्हे तर, त्यांचे जे उदात्त प्रयोजन होते, जो उदात्त अर्थ होता तो अर्थ त्या काव्याला स्वतःमध्ये अधिक सुयोग्यरीतीने धारण […]

रामायण : राष्ट्रीय चारित्र्याची घडण (भाग ०१)

भारत – एक दर्शन २३ मूलतः महाभारताचा जो साहित्य-प्रकार आहे तोच रामायणाचादेखील आहे. फरक एवढाच की रामायणाचा आराखडा अधिक साधा आहे, त्यातील वृत्ती अधिक सुकुमार आदर्शवादी आहे आणि त्यामध्ये काव्यात्मक ऊबदारपणा आणि रंग यांचा तजेला अधिक आहे. रामायणामध्ये उत्तरकालीन कवींनी पुष्कळच भर घातलेली असली तरीसुद्धा, या महाकाव्याचा अधिकांश भाग हा एकहाती लिहिण्यात आलेला आहे, हे […]

महाकाव्यांचे कार्य

भारत – एक दर्शन २२ महाभारत हा ‘पाचवा वेद’ आहे, असे म्हटले जाते. रामायण आणि महाभारत ही दोन्ही काव्यं म्हणजे फक्त महाकाव्यंच आहेत असे नाही तर, ती धर्मशास्त्रं आहेत; ती धार्मिक, नैतिक, सामाजिक आणि राजकीय शिकवणुकीचा एक मोठा भाग आहेत, असेही म्हटले जाते. आणि या महाकाव्यांचा लोकांच्या जीवनावर आणि त्यांच्या मनावर इतका प्रभाव आहे, या […]

रामायण आणि महाभारत

भारत – एक दर्शन २१ आपल्या महत्त्वाच्या परंपरेचे, इतिहासाचे ज्ञान देणे, हे जुन्या वैदिक शिक्षणाचे एक अंग होते. प्राचीन समीक्षकांनी, उत्तरकालीन साहित्यिक महाकाव्यांपासून महाभारत व रामायण यांचे वेगळेपण लक्षात यावे या हेतूने या दोन महाकाव्यासाठी ‘इतिहास’ हा शब्द योजला होता. इतिहास म्हणजे एक प्राचीन ऐतिहासिक किंवा पौराणिक परंपरा होत; आणि आध्यात्मिक किंवा धार्मिक किंवा नैतिक […]

भारताचे भाषावैभव

भारत – एक दर्शन २० संस्कृत भाषेतील प्राचीन आणि अभिजात ग्रंथांची गुणवत्ता, त्यांची अभिव्यक्ती, त्यांच्या उत्कृष्टतेची विपुलता, त्यांच्यामध्ये असणारी मौलिकता, त्यांचे सामर्थ्य आणि सौंदर्य, त्यांच्यातील आशय, त्यांची कला व रचना, त्या ग्रंथांमधील भाषेचे वैभव, विषयाला दिलेला न्याय, त्यांच्या वाणीची मोहकता, त्यांच्या प्रवृत्तीच्या पल्ल्याची उंची आणि रुंदी या सर्वच दृष्टींनी हे ग्रंथ जगाच्या महान साहित्यामध्ये निर्विवादपणे […]

हिंदुधर्मातील नीतिकल्पना आणि सापेक्ष आदर्श

भारत – एक दर्शन १९ हिंदुधर्मामध्ये, ‘अनंता’च्या संकल्पनेखालोखाल जर मुख्य स्थान कोणाला मिळाले असेल तर ते ‘धर्मा’च्या संकल्पनेला आहे; आत्म्याखालोखाल धर्म हा त्याच्या जीवनाचा पाया असतो. अशी कोणतीच नीतिकल्पना नाही की जिच्यावर हिंदुधर्माने भर दिलेला नाही. प्रत्येक नीतिकल्पना हिंदुधर्माने आदर्श स्वरूपात आणि आदेशात्मक पद्धतीने मांडली आहे. या धर्माने शिकवणुक, आदेश, बोधकथा, कलाकृती, रचनात्मक उदाहरणे यांच्या […]

भारतीय धर्माची चार तत्त्वं

भारत – एक दर्शन १८   भारतीय धर्माने मानवी जीवनासमोर चार आवश्यक गोष्टी मांडल्या. प्रथमतः त्याने, ज्या सर्वोच्च चेतनेमधूनच सारे काही उदयाला येत असते, ज्या चेतनेचा परिचय न होताच, ज्या चेतनेमध्ये सारे जीवनकार्य चालू असते; ज्या परिपूर्ण, शाश्वत आणि अनंत चेतनेविषयी एक ना एक दिवस सर्वांनी जागृत होणे आणि जिच्याकडे परत येणे गरजेचेच आहे, त्या […]

हिंदुधर्माला असलेली व्यापक जाण

भारत – एक दर्शन १७ हिंदुधर्माचे मूलभूत वैशिष्ट्य लक्षात घेतले तर आणि तरच हिंदुधर्मातील विधी, संस्कार, धार्मिकविधी, उपासनापद्धती, आणि पूजाविधी यांचे आकलन होऊ शकेल. मूलत: हा धर्म अनाग्रही आणि सर्वसमावेशक स्वरूपाचा आहे. या धर्माने त्याच्या सहवासात आलेल्या सर्व धर्मांना स्वतःमध्ये समाविष्ट करून घेतले; त्या त्या धर्मातील विधींचे पारलौकिक जगताच्या सत्याशी व ‘अनंता’च्या सत्याशी योग्य नाते […]

भारतीय धर्माचे अधिष्ठान : तीन मूलभूत संकल्पना (भाग ०३)

भारत – एक दर्शन १६   (भारतीय धर्म सर्वोच्च आणि व्यापक अशा तीन आध्यात्मिक अनुभूतींवर, तीन मूलभूत संकल्पनांवर आधारलेला आहे. त्यातील दोन गोष्टींचा विचार आत्तापर्यंत झाला. आता तिसरी संकल्पना पाहू.) भारतीय धर्माला आधारभूत असणारी तिसरी अत्यंत परिणामकारक संकल्पना ही आंतरिक आध्यात्मिक जीवनाला अतिशय गती देणारी आहे. ज्याप्रमाणे ‘परमेश्वरा’शी किंवा ‘ईश्वरा’शी वैश्विक चेतनेद्वारे संपर्क साधता येतो […]

भारतीय धर्माचे अधिष्ठान : तीन मूलभूत संकल्पना (भाग ०२)

भारत – एक दर्शन १५ (‘भारतीय’ धर्म सर्वोच्च आणि व्यापक अशा तीन आध्यात्मिक अनुभूतींवर, तीन मूलभूत संकल्पनांवर आधारलेला आहे. त्यातील दुसरी संकल्पना पुढील प्रमाणे) भारतीय धर्माची दुसरी पायाभूत संकल्पना अशी आहे की, ‘शाश्वत’ आणि ‘अनंता’कडे जाण्याचे अनेक मार्ग आहेत. जे मूळ ‘अनंत’ आहे त्यात अनेक अनंत आहेत, आणि या अनेक अनंतांपैकी प्रत्येक अनंत ‘शाश्वत’च आहे. […]