साधक : प्रसन्नचित्ताने ईश्वराला शरण कसे जायचे, ते आम्हाला सांगाल का?
श्रीमाताजी : ती शरणागती प्रामाणिक असली पाहिजे. जर ती खरोखरच प्रामाणिक असेल तर ती आनंददायी होते. जोपर्यंत शरणागती स्वीकारण्यात आनंद वाटत नाही तोपर्यंत ती शरणागती पूर्णपणे प्रामाणिक नाही, असे निश्चित समजा; कारण जर ती शरणागती खरोखरच प्रामाणिक असेल तर, ती नेहमीच आनंददायी असते.
जर ती आनंददायी नसेल तर त्याचा अर्थ असा की, तुमच्या व्यक्तित्वातील काहीतरी तुम्हाला मागे खेचत आहे, तुमच्यामधील एखाद्या भागाला शरणागती स्वीकारणे नको आहे, त्याला त्याची स्वतःची म्हणून काही इच्छा आहे, काही आकांक्षा आहे, त्याचे स्वतःचे असे काही प्रयोजन आहे आणि तो भाग संतुष्ट नाहीये आणि म्हणून तो पूर्णपणे समर्पित होत नाहीये आणि म्हणून त्याच्या समर्पणामध्ये प्रामाणिकपणा नाहीये.
पण जर व्यक्ती समर्पणामध्ये प्रामाणिक असेल तर ती अगदी स्वाभाविकपणे परिपूर्णतया आनंदी असते. खरंतर व्यक्तीला आपोआपच अवर्णनीय असा आनंद अनुभवायला मिळतो. आणि म्हणूनच, जोपर्यंत तुम्हाला असा अवर्णनीय आनंद अनुभवायला मिळत नाहीये, तोपर्यंत तुम्ही प्रामाणिक नसल्याची ती खात्रीशीर खूण आहे असे समजा. म्हणजे तुमच्यामधील एखादा भाग, एखादा लहान किंवा मोठा भाग प्रामाणिक नाहीये असे निश्चित समजा.
• श्रीमाताजी (CWM 06 : 210–211)
जो मनुष्य सत्याच्या शोधासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करतो आणि सातत्याने परिपूर्ण सत्याच्या अधिकाधिक निकट जावे…
मनुष्यप्राणी, सामान्यतः जसे जीवन जगतो त्या त्याच्या जीवनाची घडण अर्ध-स्थिर, अर्ध-तरल अशा अतिशय अपरिपूर्णतेने…
मनुष्य आणि ईश्वर यांच्या भेटीचा अर्थ नेहमीच, मनुष्यामध्ये ईश्वरत्वाचा प्रवेश आणि अंतर्भाव तसेच मनुष्याचे…
जग ही जिवाची आत्मवंचना (self-delusion) आहे किंवा जग ही सैतानाची निर्मिती आहे असे आम्ही…
(अंतिमत: नेहमी सत्याचाच विजय होतो असे म्हटले जाते पण प्रत्यक्षात मात्र परिस्थिती विपरीत दिसते,…
साधक : सृष्टीला निश्चित असे ध्येय आहे का? असे एखादे अंतिम गंतव्यस्थान आहे का…