नैराश्यापासून सुटका – ०४
नैराश्यापासून सुटका – ०४
अडचणींना सामोरे गेलेच पाहिजे आणि जेवढ्या आनंदाने तुम्ही त्या अडचणींना सामोरे जाल, तेवढ्या लवकर तुम्ही त्यांच्यावर मात करू शकाल. ”अमुक एक गोष्ट मी केलीच पाहिजे आणि ती मी करीनच,” असा दृढ संकल्प कायम राखणे हा यशाचा मूलमंत्र, हा विजयाचा निर्धार तुम्ही केला पाहिजे. हे अशक्य वाटते आहे का? अशक्य अशी कोणती गोष्टच मुळात अस्तित्वात नसते. अडचणी असू शकतात, गोष्टींना वेळ लागू शकतो, पण अशक्य असे काहीच नसते. व्यक्तीने एखादी गोष्ट करण्याचा एकदा का दृढ निश्चय केला की, आज ना उद्या ती शक्य होते.
– श्रीअरविंद (CWSA 29 : 116)
Latest posts by श्रीअरविंद (see all)
- पूर्णयोगासाठी आवश्यक असणारी तयारी - September 16, 2026
- दिव्य-सत्याचा शोध - September 15, 2026
- चैत्य पुरुष खुला होणे - September 12, 2026





