जीवन जगण्याचे शास्त्र – १८
जीवन जगण्याचे शास्त्र – १८
(एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून…)
जे मन अस्वस्थतेपासून, त्रासापासून मुक्त आहे; जे स्थिर, प्रकाशमान, आनंदी आणि उत्साही आहे; परिणामत: जे तुमच्या प्रकृतीमध्ये परिवर्तन घडवून आणणाऱ्या शक्तीप्रत खुले आहे, असे (अविचल) मन मला येथे अभिप्रेत आहे.
त्रस्त करणारे विचार, चुकीच्या भावभावना, कल्पनांचा गोंधळ, दुख:कारक गतिप्रवृत्ती यांच्या नेहमी होणाऱ्या आक्रमणापासून सुटका करून घेणे ही गोष्ट महत्त्वाची असते. या गोष्टींमुळे तुमची प्रकृती प्रक्षुब्ध होते, त्यावर एक प्रकारचे सावट येते आणि त्यामुळे ईश्वरी शक्तीला तुमच्यामध्ये कार्य करणे अधिक कठीण जाते. पण तेच मन जर का अविचल असेल, शांतिपूर्ण असेल तर, ईश्वरी शक्ती अधिक सहजतेने, सुकरतेने कार्य करू शकते.
तुमच्यामधील ज्या गोष्टींमध्ये परिवर्तन घडविणे आवश्यकच आहे, त्या गोष्टींकडे अस्वस्थ न होता किंवा निराश न होता पाहणे तुम्हाला जमले पाहिजे; म्हणजे मग ते परिवर्तन अधिक सहजतेने होईल.
– श्रीअरविंद (CWSA 29 : 160-161)
- जगाची नवनिर्मिती तरुणच करतील - June 22, 2026
- दुर्गुणांचे शुद्धीकरण - June 18, 2026
- नैतिक शिक्षणाची संधी - June 17, 2026





