जीवन जगण्याचे शास्त्र – ०८

जीवन जगण्याचे शास्त्र – ०८

सामान्य आनंदाचा उगम प्राणामध्ये असतो; तो आनंद अशुद्ध असतो आणि परिस्थितीवर अवलंबून असतो. (मात्र) खऱ्या आनंदाचा उगम ईश्वरत्वामध्ये असतो; तो विशुद्ध आणि परिपूर्ण असतो.

*

साधेपणाने राहायचे, साधी सदिच्छा बाळगायची; फार लक्षणीय असे काही करण्याची गरज नसते मात्र सर्वोत्तम असे जे करता येणे शक्य असेल ते ते करायचे आणि ते उत्तमातील उत्तम रितीने करायचे; प्रगतीसाठी, प्रकाशासाठी, सद्भावनापूर्ण शांतीसाठी अभीप्सा बाळगायची आणि तुम्ही काय केले पाहिजे व कोण झाले पाहिजे यासंबंधीचा निर्णय, या जगातील सारेकाही जो जाणतो त्या ईश्वराला घेऊ द्यायचा, हे उचित असते. तेव्हा व्यक्ती चिंतामुक्त असते आणि ती पूर्णपणे आनंदी राहू शकते.

– श्रीमाताजी (CWM 17 : 18) & (CWM 06 : 248)

श्रीमाताजी