श्रीमाताजी आणि समीपता – ४०

तुमचे आध्यात्मिक परिवर्तन व प्रगती हीच तुमच्यासाठी महत्त्वाची असली पाहिजे आणि त्यासाठी, तुमच्यासोबत असणाऱ्या श्रीमाताजींच्या शक्तीवर आणि त्यांच्या कृपेवरच पूर्णतः विश्वास ठेवा. कोणत्याही गोष्टींमुळे किंवा लोकांमुळे तुम्ही अस्वस्थ होऊ नका. कारण तुमच्या अंतरंगातील सत्याशी आणि श्रीमाताजींच्या चेतनेच्या पूर्ण प्रकाशाच्या दिशेने चाललेल्या तुमच्या वाटचालीपुढे या गोष्टी अगदी नगण्य आहेत.

*

श्रीमाताजी हे ध्येय आहे, (कारण) सारेकाही त्यांच्यामध्येच सामावलेले आहे. त्यांची कृपा प्राप्त झाली की सारे प्राप्त झाल्यासारखेच आहे. तुम्ही जर श्रीमाताजींच्या चेतनेमध्ये राहिलात तर अन्य सारेकाही स्वतःहूनच उलगडत जाईल.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 397)

श्रीअरविंद
Latest posts by श्रीअरविंद (see all)