साधना, योग आणि रूपांतरण – २०१
व्यक्ती जर नेहमीच उच्चतर चेतनेमध्ये राहू शकली तर, ते अधिक चांगले असते. परंतु मग व्यक्ती नेहमीच तिथे का राहत नाही? कारण निम्नतर चेतना ही अजूनही प्रकृतीचा भाग आहे आणि ती चेतना तुम्हाला स्वतःच्या दिशेने खाली खेचत राहते. पण समजा निम्नतर चेतनाच रूपांतरित झाली तर, ती एक प्रकारे उच्चतर चेतनेचाच भाग बनते आणि मग खाली खेचण्यासाठी निम्न असे काही शिल्लकच राहात नाही.
मन, प्राण आणि शरीर यांच्यामध्ये उच्चतर चेतना किंवा उच्चतर प्रकृती उतरविणे आणि तिने निम्नतर चेतनेची जागा घेणे म्हणजे ‘रूपांतरण’.
खऱ्या आत्म्याची एक उच्चतर चेतना असते, की जी आध्यात्मिक असते; ती ऊर्ध्वस्थित असते. एखाद्या व्यक्तीने जर त्या चेतनेमध्ये आरोहण केले तर, जेवढा काळ ती व्यक्ती तेथे असते तेवढा काळ ती मुक्त असते. परंतु ती व्यक्ती जर पुन्हा मन, प्राण आणि शरीरामध्ये उतरली किंवा त्यांचा उपयोग करू लागली आणि त्या व्यक्तीने जर जीवनाशी संबंध कायम ठेवला – अर्थात तिला तसे करावेच लागते – तर अशावेळी ती व्यक्ती एकतर खाली म्हणजे (मन, प्राण, शरीरामध्ये) उतरून, सामान्य चेतनेमध्ये राहून जीवन जगू लागते किंवा मग असेही घडू शकते की, ती व्यक्ती आत्मस्थित राहूनच मन, प्राण आणि शरीर यांचा उपयोग करू लागते. या अवस्थेतील व्यक्तीला मन, प्राण आणि शरीरादी साधनांच्या अपूर्णतांना सामोरे जावे लागते आणि या साधनांमध्ये सुधारणा घडवून आणावी लागते. आणि ती सुधारणा फक्त ‘रूपांतरणा’द्वारेच घडविणे शक्य असते.
– श्रीअरविंद (CWSA 30 : 422-423)
“ज्याच्याकडे स्वतःच्या मालकीचे काहीच नसते तो आनंदी असतो,” असे म्हटले जाते तेव्हा त्याचा अर्थ असा…
(उत्तरार्ध) आंतरिक ‘सूर्य’ शोधण्यासाठी तुम्ही अंतरंगामध्ये पुरेसे खोलवर गेले पाहिजे, त्या सूर्याच्या तेजोप्रवाहामध्ये स्वतःला प्रवाहित…
पृथ्वीवरील जीवन परिपूर्ण करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे या जीवनाकडे इतक्या उंचीवरून पाहायचे की, जेथून व्यक्तीला…
हृदयापासून असलेली अभीप्सा आणि (परमेश्वराचा) अंत:करणपूर्वक केलेला साधा, सरळ, प्रामाणिक धावा ही एक अतिशय महत्त्वाची…
तुमचे वैयक्तिक मोल कितीही असू दे किंवा तुम्हाला व्यक्तिगतरित्या कोणताही साक्षात्कार झालेला असू दे, पहिला…
आपल्या 'मी'ला अस्तित्व नसून, केवळ परम चेतना, परम संकल्पशक्ती हीच अस्तित्वात आहे, हे जाणणे यामध्ये…