साधना, योग आणि रूपांतरण – १४७
पूर्णयोगांतर्गत भक्ती
नामोच्चारणामध्ये शक्ती असते पण ते जर हृदयातून आणि अंतःकरणातून आलेले असेल तरच! केवळ मनाद्वारे केलेली पुनरावृत्ती पुरेशी नसते.
*
कोणत्याही देवदेवतेचे नामस्मरण केले तरी त्या नामस्मरणाला प्रतिसाद देणारी ‘शक्ती’ म्हणजे (स्वयं) श्रीमाताजीच असतात. प्रत्येक नामाद्वारे ईश्वराच्या एका विशिष्ट पैलूचा निर्देश होतो आणि ते नाम त्या पैलूपुरतेच मर्यादित असते; श्रीमाताजींची शक्ती मात्र वैश्विक आहे.
*
साहजिकच आहे की, व्यक्ती जाग्रतावस्थेमध्ये ज्या कोणत्या नामावर लक्ष केंद्रित करते, ते नाम निद्रावस्थेमध्येसुद्धा आपोआप पुनरावृत्त होत राहते. परंतु निद्रावस्थेमध्ये श्रीमाताजींच्या नामाचा धावा करणे हे नामस्मरणच असेल असे नाही. बरेचदा असे होते की, आंतरिक पुरुष अडचणीमध्ये असताना किंवा त्याला तशी निकड जाणवत असेल तर तो श्रीमाताजींना आवाहन करत असतो.
*
श्वासाबरोबर नामस्मरण करण्यास मी फारसे प्रोत्साहन देत नाही कारण मग ते प्राणायामासारखे होते. प्राणायाम ही अत्यंत शक्तिशाली गोष्ट आहे, परंतु प्राणायाम जर घाईगडबडीने केला गेला तर त्यातून अडथळे निर्माण होऊ शकतात आणि अतिशय टोकाच्या परिस्थितीमध्ये तर त्यामुळे शरीराला आजारपण येऊ शकते.
– श्रीअरविंद (CWSA 29 : 327)
- साधना, योग आणि रूपांतरण – २५७ - February 19, 2025
- साधना, योग आणि रूपांतरण – २५६ - February 18, 2025
- साधना, योग आणि रूपांतरण – २५५ - February 17, 2025