साधना, योग आणि रूपांतरण – १३४

(कर्म करत असताना कधी एकदम उल्हसित, उत्साही वाटते तर कधी शांत वाटते, हे असे का होत असावे असे एका साधकाने विचारले आहे, असे दिसते. त्यावर श्रीअरविंद यांनी दिलेले हे उत्तर…)

कर्म करत असताना, तुमच्या ज्या मनोवस्था असतात त्या दोन मनोवस्थांच्या (moods) परिणामांमध्ये फरक दिसून येतो; याचे कारण असे की, पहिली मनोवस्था ही प्राणिक हर्षोल्हासाची (vital joy) आहे, तर दुसरी मनोवस्था ही आंतरात्मिक शांतीची (psychic quiet) आहे. प्राणिक हर्षोल्हास हा सामान्य मानवी जीवनात जरी अतिशय साहाय्यकारी असला तरी तो काहीसा उत्तेजित, अधीर असतो आणि अस्थिर पायावर उभा असल्यामुळे चंचल असतो. आणि म्हणूनच तो लवकर थकून जातो आणि पुढे टिकून राहू शकत नाही.

प्राणिक हर्षोल्हासाची जागा निश्चल, स्थिर अशा आंतरात्मिक आनंदाने घेतली गेली पाहिजे आणि त्याचवेळी मन व प्राण हे अतिशय निर्मळ आणि अत्यंत शांतिपूर्ण असले पाहिजेत. जेव्हा व्यक्ती या आधारावर कर्म करते तेव्हा ती, श्रीमाताजींच्या शक्तीच्या संपर्कात येते आणि त्यामुळे सर्वकाही आनंदमय आणि सुकर होते; आणि मग थकवा येत नाही किंवा नैराश्यही येत नाही.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 252)

श्रीअरविंद