साधना, योग आणि रूपांतरण – ७४
(एका साधकाने ‘ध्याना’मध्ये त्याला जो साक्षात्कार झाला त्यासंबंधी श्रीअरविंद यांना लिहून कळविले आहे, असे दिसते. त्यावर श्रीअरविंद यांनी दिलेले हे उत्तर…)
वास्तविक, हा साक्षात्कार जाग्रतावस्थेमध्ये होणे आवश्यक आहे आणि तो जीवनाची वास्तविकता व्हावी यासाठी टिकून राहणेदेखील आवश्यक आहे. केवळ समाधी अवस्थेमध्येच जर त्याचा अनुभव आला तर तो अतिचेतन (superconscient) स्थितीचा, आंतरिक अस्तित्वाच्या फक्त काही भागांसाठीच खरा असणारा अनुभव असेल; मात्र तो संपूर्ण चेतनेला खरा वाटणार नाही.
समाधी अवस्थेमधील अनुभवांचा उपयोग व्यक्तित्व खुले होण्यासाठी आणि त्याच्या तयारीसाठी होतो. परंतु (ध्यानामधील) साक्षात्कार जेव्हा जाग्रतावस्थेमध्येही नित्य टिकून राहतो तेव्हा तो खऱ्या अर्थाने प्राप्त झालेला असतो. त्यामुळे ‘पूर्णयोगा’मध्ये जाग्रतावस्थेतील अनुभवाला आणि साक्षात्काराला सर्वाधिक महत्त्व दिले जाते.
‘स्थिरचित्त नित्य-विस्तारत जाणाऱ्या या चेतनमध्ये कर्म करणे ही एकाच वेळी साधना असते आणि तीच सिद्धीही असते,’ हे जे तुम्ही कर्माबाबत लिहिले आहे ते योग्य आहे.
– श्रीअरविंद (CWSA 30 : 253)
- विचारमुक्त होण्याचा मार्ग - February 12, 2025
- दोन प्रकारचे आकलन - February 11, 2025
- बुद्धीला आंतरिक प्रकाशाची आवश्यकता - February 10, 2025