ध्यानातून बाहेर येताना…
साधना, योग आणि रूपांतरण – ५३
तुम्ही अंतरंगामध्ये खोलवर आणि अविचल स्थितीमध्ये प्रवेश केलेला असतो. पण जर व्यक्ती अशा स्थितीमधून अगदी अचानकपणे बाहेर सामान्य चेतनेमध्ये आली तर, तुम्ही म्हणता तसा मज्जातंतुला किंचितसा धक्का बसू शकतो किंवा थोड्या वेळासाठी हृदयाची धडधड वाढू शकते. आंतरिक स्थितीमधून डोळे उघडून बाहेर येताना, काही क्षणांसाठी शांत-स्थिर, अविचल राहणे हे नेहमीच उत्तम असते.
*
ध्यानानंतर काही कालावधीसाठी शांत, निश्चल-नीरव आणि एकाग्रचित्त राहणे हे निश्चितपणे अधिक चांगले. ध्यान गांभीर्याने न घेणे ही चूक आहे कारण तसे केल्याने व्यक्ती ध्यानामध्ये काही ग्रहण करू शकत नाही किंवा तिने जे ग्रहण केलेले असते ते सर्व किंवा त्यातील बहुतांश भाग वाया जातो.
*
तुमचे ध्यान व्यवस्थित चालू असते पण जेव्हा तुम्ही ध्यानातून बाहेर येता तेव्हा लगेच सामान्य चेतनेमध्ये जाऊन पडता आणि हीच अडचण आहे. कामकाजामध्ये गढलेले असतानादेखील, तुमची खरी चेतना कायम ठेवण्याचा तुम्ही प्रयत्न केला पाहिजे. असे केलेत तर मग साधना सदासर्वकाळ चालू राहील आणि मग तुमची अडचण नाहीशी होईल.
– श्रीअरविंद (CWSA 29 : 313-314)
- ईश्वराच्या निवासाचे दरवाजे - April 29, 2026
- अप्रामाणिकपणाचा अडथळा - April 28, 2026
- योगामार्गासाठी पात्र-अपात्रता - April 23, 2026




