भारत – एक दर्शन २१
आपल्या महत्त्वाच्या परंपरेचे, इतिहासाचे ज्ञान देणे, हे जुन्या वैदिक शिक्षणाचे एक अंग होते. प्राचीन समीक्षकांनी, उत्तरकालीन साहित्यिक महाकाव्यांपासून महाभारत व रामायण यांचे वेगळेपण लक्षात यावे या हेतूने या दोन महाकाव्यासाठी ‘इतिहास’ हा शब्द योजला होता. इतिहास म्हणजे एक प्राचीन ऐतिहासिक किंवा पौराणिक परंपरा होत; आणि आध्यात्मिक किंवा धार्मिक किंवा नैतिक किंवा एखादा आदर्शवादी अर्थ अभिव्यक्त करणारी कहाणी वा अर्थपूर्ण आख्यायिका म्हणून तिचा सर्जनात्मक उपयोग केला जात असे. आणि अशा प्रकारे लोकमानस घडविण्यासाठी त्यांचा उपयोग होत असे. महाभारत आणि रामायण या साहित्यकृती मोठ्या प्रमाणावर अशा प्रकारे इतिहास कथन करणाऱ्या आहेत आणि त्यांचे प्रयोजनदेखील व्यापक आहे.
ज्या कवींनी ही महाकाव्यं लिहिली आणि ज्यांनी या काव्यात्मक लिखाणामध्ये काही भर घातली त्या कवींचा त्या लिखाणामागचा उद्देश, हा एखादी प्राचीन कथा सुंदर वा उदात्त पद्धतीने सांगावी एवढाच नव्हता किंवा एक अतिशय रसगर्भ, अर्थगर्भ अशी रचना करावी असाही नव्हता, या दोन्ही निकषांमध्ये त्यांना उत्तुंग यश मिळालेले असले तरी, तो काही त्यांचा उद्देश नव्हता. तर ती काव्यं त्यांनी आपण जीवनाचे स्थापत्यकार आहोत, शिल्पकार आहोत या भूमिकेतून लिहिली आहेत. आपण राष्ट्रीय विचार, धर्म, नीती आणि संस्कृती यांना अर्थपूर्ण आकार देणारे रचनाकार, सर्जनशील अभिव्याख्याते आहोत या भूमिकेतून त्यांनी ते लिखाण केले होते. या महाकाव्यांमध्ये जीवनाविषयी सखोल विचार आहेत, धर्म व समाज यांविषयी विशाल आणि महत्त्वपूर्ण दृष्टिकोन आहे, या महाकाव्यांमधून काही अंशी तत्त्वज्ञानात्मक संकल्पनांचा प्रवाह खेळविण्यात आलेला आहे, या महाकाव्यांमध्ये बौद्धिक संकल्पनांच्या महान शक्तीच्या आणि जिवंत सादरीकरणाच्या साहाय्याने, भारताची प्राचीन संस्कृतीच जणू मूर्तिमंत करण्यात आली आहे.
– श्रीअरविंद [CWSA 20 : 345-346]
“ज्याच्याकडे स्वतःच्या मालकीचे काहीच नसते तो आनंदी असतो,” असे म्हटले जाते तेव्हा त्याचा अर्थ असा…
(उत्तरार्ध) आंतरिक ‘सूर्य’ शोधण्यासाठी तुम्ही अंतरंगामध्ये पुरेसे खोलवर गेले पाहिजे, त्या सूर्याच्या तेजोप्रवाहामध्ये स्वतःला प्रवाहित…
पृथ्वीवरील जीवन परिपूर्ण करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे या जीवनाकडे इतक्या उंचीवरून पाहायचे की, जेथून व्यक्तीला…
हृदयापासून असलेली अभीप्सा आणि (परमेश्वराचा) अंत:करणपूर्वक केलेला साधा, सरळ, प्रामाणिक धावा ही एक अतिशय महत्त्वाची…
तुमचे वैयक्तिक मोल कितीही असू दे किंवा तुम्हाला व्यक्तिगतरित्या कोणताही साक्षात्कार झालेला असू दे, पहिला…
आपल्या 'मी'ला अस्तित्व नसून, केवळ परम चेतना, परम संकल्पशक्ती हीच अस्तित्वात आहे, हे जाणणे यामध्ये…