ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

रामायण आणि महाभारत

भारत – एक दर्शन २१

आपल्या महत्त्वाच्या परंपरेचे, इतिहासाचे ज्ञान देणे, हे जुन्या वैदिक शिक्षणाचे एक अंग होते. प्राचीन समीक्षकांनी, उत्तरकालीन साहित्यिक महाकाव्यांपासून महाभारत व रामायण यांचे वेगळेपण लक्षात यावे या हेतूने या दोन महाकाव्यासाठी ‘इतिहास’ हा शब्द योजला होता. इतिहास म्हणजे एक प्राचीन ऐतिहासिक किंवा पौराणिक परंपरा होत; आणि आध्यात्मिक किंवा धार्मिक किंवा नैतिक किंवा एखादा आदर्शवादी अर्थ अभिव्यक्त करणारी कहाणी वा अर्थपूर्ण आख्यायिका म्हणून तिचा सर्जनात्मक उपयोग केला जात असे. आणि अशा प्रकारे लोकमानस घडविण्यासाठी त्यांचा उपयोग होत असे. महाभारत आणि रामायण या साहित्यकृती मोठ्या प्रमाणावर अशा प्रकारे इतिहास कथन करणाऱ्या आहेत आणि त्यांचे प्रयोजनदेखील व्यापक आहे.

ज्या कवींनी ही महाकाव्यं लिहिली आणि ज्यांनी या काव्यात्मक लिखाणामध्ये काही भर घातली त्या कवींचा त्या लिखाणामागचा उद्देश, हा एखादी प्राचीन कथा सुंदर वा उदात्त पद्धतीने सांगावी एवढाच नव्हता किंवा एक अतिशय रसगर्भ, अर्थगर्भ अशी रचना करावी असाही नव्हता, या दोन्ही निकषांमध्ये त्यांना उत्तुंग यश मिळालेले असले तरी, तो काही त्यांचा उद्देश नव्हता. तर ती काव्यं त्यांनी आपण जीवनाचे स्थापत्यकार आहोत, शिल्पकार आहोत या भूमिकेतून लिहिली आहेत. आपण राष्ट्रीय विचार, धर्म, नीती आणि संस्कृती यांना अर्थपूर्ण आकार देणारे रचनाकार, सर्जनशील अभिव्याख्याते आहोत या भूमिकेतून त्यांनी ते लिखाण केले होते. या महाकाव्यांमध्ये जीवनाविषयी सखोल विचार आहेत, धर्म व समाज यांविषयी विशाल आणि महत्त्वपूर्ण दृष्टिकोन आहे, या महाकाव्यांमधून काही अंशी तत्त्वज्ञानात्मक संकल्पनांचा प्रवाह खेळविण्यात आलेला आहे, या महाकाव्यांमध्ये बौद्धिक संकल्पनांच्या महान शक्तीच्या आणि जिवंत सादरीकरणाच्या साहाय्याने, भारताची प्राचीन संस्कृतीच जणू मूर्तिमंत करण्यात आली आहे.

– श्रीअरविंद [CWSA 20 : 345-346]

श्रीअरविंद

श्री अरविंद यांची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व बंगाली भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४५

अधीरता नेहमीच चुकीची असते. ती साधनेला साहाय्य करत नाही तर, ती अडथळे निर्माण करते. अविचल,…

12 hours ago

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४४

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४४ (श्रीअरविंद लिखित पत्रामधून...) कोणतीही अडचण आली किंवा कितीही त्रास सहन करावा…

2 days ago

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४३

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४३ (श्रीअरविंद लिखित पत्रामधून...) साधनेमध्ये सुरुवातीच्या टप्प्यावर नेहमीच अडचणी येतात आणि त्यामुळे…

3 days ago

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४२

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४२ (श्रीअरविंद लिखित पत्रामधून...) नामस्मरणाच्या शक्तीचा आणि संरक्षणाचा तुम्हाला अनुभव आला आहे…

4 days ago

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४१

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४१ (मला फक्त ईश्वर दर्शनाचीच आस आहे, पण तरीही तो मला दर्शन…

5 days ago

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४०

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४० (उत्तरार्ध) एखादी अशी गोष्ट की, जी अद्यापि आविष्कृत किंवा साध्य झालेली…

6 days ago