आध्यात्मिकता ३३
आपण वाचन करतो, आपण समजावून घेण्याचा प्रयत्न करतो, आपण स्पष्टीकरण करतो, आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. परंतु हजारो स्पष्टीकरणांपेक्षा आणि लाखो शब्दांपेक्षा, खऱ्या अनुभवाचा एक क्षणदेखील आपल्याला बरेच काही शिकवून जातो. त्यामुळे पहिला प्रश्न येतो तो असा की, ”हा अनुभव घ्यायचा कसा?”
स्वतःच्या अंतरंगामध्ये प्रवेश करणे ही पहिली पायरी आहे.
तुमच्या अंतरंगामध्ये असलेल्या सद्वस्तुची (reality) जाणीव होण्याइतपत, तुमच्या अंतरंगामध्ये पुरेसे खोलवर जाण्यात एकदा का तुम्ही यशस्वी झालात की मग, तुम्ही स्वतःला क्रमाक्रमाने, पद्धतशीरपणे व्यापक करायचे आणि या ब्रह्मांडाएवढे विशाल व्हायचे आणि स्वतःच्या सीमिततेची जाणीव दूर करायची.
पूर्वतयारी करून घेणाऱ्या या पहिल्या दोन प्रक्रिया आहेत. आणि या दोन्ही गोष्टी शक्य तितक्या जास्तीत जास्त स्थिरपणे, शांतपणे आणि प्रशांततेमध्ये केल्या पाहिजेत. ही शांती, ही प्रशांतता, मनामध्ये नीरवता आणि प्राणामध्ये स्थिरपणा निर्माण करते. हा प्रयत्न, हा प्रयास अगदी नियमितपणे, चिकाटीने पुन्हा पुन्हा नव्याने करत राहिला पाहिजे. आणि मग काही विशिष्ट कालावधीनंतर, (हा कालावधी कमी किंवा जास्त असू शकतो) तुम्हाला अशा एका वास्तविकतेची (त्या सद्वस्तुची) जाणीव होऊ लागते की जी वास्तविकता, सर्वसामान्य, बाह्य चेतनेला वास्तवाचा जो बोध होतो त्यापेक्षा निराळी असते.
स्वाभाविकपणे, बाह्य चेतना आणि आंतरिक चेतना यांमधील पडदा अंतरंगामधूनच ‘ईश्वरी कृपे’च्या कृतीमुळे अचानक दूर केला जाऊ शकतो आणि तुमचा एकाएकी खऱ्या सत्यामध्ये प्रवेश होऊ शकतो. पण असे घडून आले तरीसुद्धा, या अनुभूतीचे संपूर्ण मूल्य आणि संपूर्ण परिणाम प्राप्त करून घेण्यासाठी, तुम्ही स्वतःला कायम आंतरिक ग्रहणशीलतेच्या (inner receptivity) स्थितीमध्ये ठेवले पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही दररोज अंतरंगामध्ये प्रवेश करणे आवश्यकच असते.
– श्रीमाताजी [CWM 10 : 19-20]
“ज्याच्याकडे स्वतःच्या मालकीचे काहीच नसते तो आनंदी असतो,” असे म्हटले जाते तेव्हा त्याचा अर्थ असा…
(उत्तरार्ध) आंतरिक ‘सूर्य’ शोधण्यासाठी तुम्ही अंतरंगामध्ये पुरेसे खोलवर गेले पाहिजे, त्या सूर्याच्या तेजोप्रवाहामध्ये स्वतःला प्रवाहित…
पृथ्वीवरील जीवन परिपूर्ण करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे या जीवनाकडे इतक्या उंचीवरून पाहायचे की, जेथून व्यक्तीला…
हृदयापासून असलेली अभीप्सा आणि (परमेश्वराचा) अंत:करणपूर्वक केलेला साधा, सरळ, प्रामाणिक धावा ही एक अतिशय महत्त्वाची…
तुमचे वैयक्तिक मोल कितीही असू दे किंवा तुम्हाला व्यक्तिगतरित्या कोणताही साक्षात्कार झालेला असू दे, पहिला…
आपल्या 'मी'ला अस्तित्व नसून, केवळ परम चेतना, परम संकल्पशक्ती हीच अस्तित्वात आहे, हे जाणणे यामध्ये…