कौटुंबिक बंध
व्यक्ती जेव्हा आध्यात्मिक जीवनात प्रवेश करते तेव्हा सामान्य प्रकृतीशी संबंधित असणारे कौटुंबिक बंध गळून पडतात – व्यक्ती या जुन्या गोष्टींबाबत तटस्थ होऊन जाते. ही तटस्थता म्हणजे एक प्रकारची मुक्ती असते. त्यामध्ये कटुता असण्याची अजिबात आवश्यकता नाही. जुन्या भौतिक जिव्हाळ्याचे बंध तसेच कायम राहणे म्हणजे सामान्य प्रकृतीला बांधून राहण्यासारखे असते आणि त्यामुळे आध्यात्मिक प्रगतीला अडसर निर्माण होतो.
-श्रीअरविंद
(CWSA 31 : 291)
Latest posts by श्रीअरविंद (see all)
- पूर्णयोगाचे अधिष्ठान – १६ - November 14, 2025
- पूर्णयोगाचे अधिष्ठान – १५ - November 13, 2025
- पूर्णयोगाचे अधिष्ठान – १४ - November 12, 2025






