…त्या क्षणीच सारे दुःखभोग संपून जातात.
विचार शलाका – ११
आपण कोणीच नाही, आपण काहीच करू शकत नाही, आपले अस्तित्वच नाही, आपण काहीच नाही, दिव्य ‘चेतना’ आणि दिव्य ‘कृपा’ यांच्याविना कोणते अस्तित्वच नाही हे खोलवर कळण्यासाठी आयुष्यात कितीतरी टक्केटोणपे खावे लागतात. आणि ज्या क्षणी माणसाला हे उमगते, त्या क्षणीच सारे दुःखभोग संपून जातात, त्याचवेळी साऱ्या अडचणी दूर होतात. एखाद्याला जेव्हा हे पूर्णार्थाने कळते आणि विरोध करणारे काहीच शिल्लक रहात नाही… पण त्या क्षणापर्यंतच… तो क्षण यायलाच खूप वेळ लागतो. …हे न विसरण्याइतकी जर एखादी व्यक्ती भाग्यवान असेल तर ती या मार्गावर वेगाने पुढे जाऊ शकते.
– श्रीमाताजी
(CWM 06 : 323-324)
Latest posts by श्रीमाताजी (see all)
- प्रामाणिकपणाचे शत्रू - March 19, 2026
- इच्छाशक्तीचा अभाव? नाही, प्रामाणिकपणाचा! - March 17, 2026
- स्वत:ला न फसविणे अवघड - March 16, 2026






