ईश्वरी’ संरक्षणाचा मार्ग
विचार शलाका – ०६
सच्च्या साधकभावाने जे जीवन व्यतीत करतात, जे ‘ईश्वरा’ठायीच त्यांची चेतना आणि एकाग्रता दृढ ठेवतात, फक्त ‘ईश्वर’ हेच ज्यांचे साध्य असते, जे दास्य भावाने ‘ईश्वरा’ची सेवा करतात, जे ‘ईश्वरा’शी संपूर्णतया एकनिष्ठ असतात, केवळ त्यांनाच ‘ईश्वर’ संरक्षण देऊ शकतो.
एखाद्याचा आवडीनिवडींचा, सुखसोयींचा आग्रह, दांभिकपणा, अप्रामाणिकपणा व मिथ्याचार यांच्या सर्व गतिविधी इत्यादी वासना या म्हणजे, ‘ईश्वरी’ संरक्षणाचा मार्ग अडवून उभे ठाकणारे प्रचंड अडथळे असतात. तुम्ही जर तुमची स्वत:ची इच्छा ‘ईश्वरा’वर लादू पहात असाल तर, ते म्हणजे एखादा बॉम्ब तुमच्यावर येऊन आदळावा म्हणून त्या बॉम्बलाच आमंत्रण देण्यासारखे आहे. गोष्टी अशा रीतीनेच घडतील, असे मी म्हणत नाही. पण लोक जर जागरूक व अतिशय सतर्क झाले नाहीत आणि सच्च्या साधकभावाने वागले नाहीत, तर गोष्टी अशा रीतीनेच घडण्याची दाट शक्यता असते.
– श्रीमाताजी
(CWM 13 : 121)
- अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १८ - January 30, 2026
- अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १७ - January 29, 2026
- अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १६ - January 28, 2026





