पूर्णयोगात अपेक्षित असलेला परित्याग
विचार शलाका – २६
तुम्ही हे समजून घेतले पाहिजे की, मठ, तपस्वी आणि संन्यासी तयार करणे हे काही माझे जीवितकार्य नाही; तर बलवान आत्म्यांना ‘कृष्ण’ आणि ‘काली’ यांच्या ‘लीले’मध्ये परत बोलविणे हे माझे कार्य आहे. ही माझी शिकवण आहे, ‘रिव्ह्यू’च्या अंकांमधूनही तुम्हाला ती पाहावयास मिळेल. माझे नाव कधीच मठादी प्रकारांशी किंवा संन्यासवादी आदर्शांशी जोडले जाता कामा नये. बुद्धाच्या काळापासून सुरु झालेल्या संन्यासमार्गाच्या प्रत्येक चळवळीमुळे भारत दुर्बल बनत गेला आहे आणि त्याचे कारण उघड आहे. जीवनाचा परित्याग ही एक गोष्ट आहे आणि खुद्द जीवनच मग ते राष्ट्रीय असो, वैयक्तिक असो, की वैश्विक जीवन असो ते जीवन महान आणि अधिक दिव्य बनविणे ही दुसरी गोष्ट आहे. …अहंकाराचा परित्याग आणि जीवनामध्ये ‘ईश्वरा’चा स्वीकार हा ‘योग’ मी शिकवितो – इतर कोणत्याही परित्यागाची शिकवण मी देत नाही.
– श्रीअरविंद
(CWSA 36 : 222)
- पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४५ - December 13, 2025
- पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४४ - December 12, 2025
- पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४३ - December 11, 2025






