(इसवी सन : १८९० ते १९०६)
आपल्यामध्ये प्रेमाची, उत्साहाची, ‘भक्ती’ची कमतरता आहे का? नाही, या गोष्टी तर भारतीय प्रकृतीमध्येच रुजलेल्या आहेत, पण ‘शक्ति’च्या अभावामुळे आपण लक्ष केंद्रित करू शकत नाही, त्यांना आपण दिशा देऊ शकत नाही, एवढेच काय पण आपण त्या टिकवून देखील ठेवू शकत नाही. ‘भक्ती’ ही धगधगती ज्वाळा आहे तर, ‘शक्ती’ हे तिचे इंधन आहे. जर इंधनच अपुरे असेल तर अग्नी किती काळ टिकून राहील? एखाद्या व्यक्तीकडे सुदृढ प्रकृती असून, ती व्यक्ती जर ज्ञानप्रदीप्त, शिस्तबद्ध असेल तसेच ‘कर्मा’मुळे तिला महाकाय सामर्थ्य प्रदान करण्यात आलेले असेल; आणि त्यातूनही जर अशी व्यक्ती ईश्वरविषयक प्रेमाने आणि भक्तीने स्वत:ला उन्नत करेल, तर अशी भक्ती टिकून राहील आणि अशा व्यक्तीचा आत्मा हा ‘ईश्वरा’बरोबर सदैव ऐक्य पावलेला असेल. पण दुर्बल प्रकृतीची व्यक्ती परिपूर्ण ‘भक्ती’सारख्या महान गोष्टीचा आवेग झेलू शकण्यास फारच कमकुवत ठरते; तो एक क्षणभरासाठीच उचलला जातो, मग ती ज्वाळा थेट ‘स्वर्गा’लाच जाऊन भिडते आणि ती व्यक्ती पूर्णपणे थकून जाते, पूर्वीपेक्षाही अधिक दुर्बल बनून जाते. ज्याद्वारे सर्व जीवनव्यवहार घडत असतात ते मानवी जडद्रव्य जोपर्यंत, कमजोर आणि अल्प असते तोपर्यंत, त्यातून निर्माण होणाऱ्या आणि उत्साह व भक्ती हाच ज्यांचा प्राण आहे अशी प्रत्येक गोष्ट असफल होणे आणि भाजून निघणे, क्रमप्राप्तच आहे.
– श्रीअरविंद
(CWSA 06-07 : 82)
“ज्याच्याकडे स्वतःच्या मालकीचे काहीच नसते तो आनंदी असतो,” असे म्हटले जाते तेव्हा त्याचा अर्थ असा…
(उत्तरार्ध) आंतरिक ‘सूर्य’ शोधण्यासाठी तुम्ही अंतरंगामध्ये पुरेसे खोलवर गेले पाहिजे, त्या सूर्याच्या तेजोप्रवाहामध्ये स्वतःला प्रवाहित…
पृथ्वीवरील जीवन परिपूर्ण करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे या जीवनाकडे इतक्या उंचीवरून पाहायचे की, जेथून व्यक्तीला…
हृदयापासून असलेली अभीप्सा आणि (परमेश्वराचा) अंत:करणपूर्वक केलेला साधा, सरळ, प्रामाणिक धावा ही एक अतिशय महत्त्वाची…
तुमचे वैयक्तिक मोल कितीही असू दे किंवा तुम्हाला व्यक्तिगतरित्या कोणताही साक्षात्कार झालेला असू दे, पहिला…
आपल्या 'मी'ला अस्तित्व नसून, केवळ परम चेतना, परम संकल्पशक्ती हीच अस्तित्वात आहे, हे जाणणे यामध्ये…